Mumbai Pune Road : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुसाट! अटल सेतूला एक्स्प्रेस वे जोडणार

मुंबई : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे प्रवाशांची वाढती संख्या तसेच वाहनांची मोठी गर्दी पाहता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अटल सेतू (Atal Setu) पुलाजवळ १४ पदरी रस्ता बनवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अटल सेतूवरुन खाली उतरल्यानंतर १४ लेन असणारा रस्ता तयार केला जाणाऱ्या या कामाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. नागरिकांच्या या गोष्टीला आता पुर्णविराम मिळाला असून त्याबाबत आता लवकरच अटल सेतूला एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Express Way) जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी गतीने होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते मुंबई रस्तेमार्गे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला अटल सेतू मार्ग आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या महामार्गामुळे अटल सेतुवरुन (Atal Setu) थेट सोलापूर आणि सातऱ्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. त्याचबरोबर नव्या महामार्गामुळे पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरू प्रवास अतिशय सोपं होणार आहे.



कसा असेल नवा महामार्ग?


नव्या प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाईल. १३० किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असेल. या मार्गावर वेगवान प्रवासासाठी एकूण ८ लेन असतील. या रस्त्याच्या बांधणीसाठी तब्बल १७ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.



पुण्याला रिंग रोडने जोडणार 


तयार होणारा नवीन महामार्ग पुण्याला रिंग रोडने जोडला जाईल आणि पुढे बेंगळुरूपर्यंत विस्तारेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. तसेच अटल सेतूजवळ १४ पदरी रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला रिंग रोडने आणि नंतर बेंगळुरूला जोडला जाईल. जेणेकरुन या रस्त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ५० टक्क्याने कमी होईल.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे