Mumbai Pune Road : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुसाट! अटल सेतूला एक्स्प्रेस वे जोडणार

मुंबई : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे प्रवाशांची वाढती संख्या तसेच वाहनांची मोठी गर्दी पाहता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अटल सेतू (Atal Setu) पुलाजवळ १४ पदरी रस्ता बनवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अटल सेतूवरुन खाली उतरल्यानंतर १४ लेन असणारा रस्ता तयार केला जाणाऱ्या या कामाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. नागरिकांच्या या गोष्टीला आता पुर्णविराम मिळाला असून त्याबाबत आता लवकरच अटल सेतूला एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Express Way) जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी गतीने होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते मुंबई रस्तेमार्गे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला अटल सेतू मार्ग आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या महामार्गामुळे अटल सेतुवरुन (Atal Setu) थेट सोलापूर आणि सातऱ्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. त्याचबरोबर नव्या महामार्गामुळे पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरू प्रवास अतिशय सोपं होणार आहे.



कसा असेल नवा महामार्ग?


नव्या प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाईल. १३० किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असेल. या मार्गावर वेगवान प्रवासासाठी एकूण ८ लेन असतील. या रस्त्याच्या बांधणीसाठी तब्बल १७ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.



पुण्याला रिंग रोडने जोडणार 


तयार होणारा नवीन महामार्ग पुण्याला रिंग रोडने जोडला जाईल आणि पुढे बेंगळुरूपर्यंत विस्तारेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. तसेच अटल सेतूजवळ १४ पदरी रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला रिंग रोडने आणि नंतर बेंगळुरूला जोडला जाईल. जेणेकरुन या रस्त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ५० टक्क्याने कमी होईल.

Comments
Add Comment

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन