Mumbai Pune Road : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुसाट! अटल सेतूला एक्स्प्रेस वे जोडणार

  169

मुंबई : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे प्रवाशांची वाढती संख्या तसेच वाहनांची मोठी गर्दी पाहता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अटल सेतू (Atal Setu) पुलाजवळ १४ पदरी रस्ता बनवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अटल सेतूवरुन खाली उतरल्यानंतर १४ लेन असणारा रस्ता तयार केला जाणाऱ्या या कामाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. नागरिकांच्या या गोष्टीला आता पुर्णविराम मिळाला असून त्याबाबत आता लवकरच अटल सेतूला एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Express Way) जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी गतीने होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते मुंबई रस्तेमार्गे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला अटल सेतू मार्ग आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या महामार्गामुळे अटल सेतुवरुन (Atal Setu) थेट सोलापूर आणि सातऱ्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. त्याचबरोबर नव्या महामार्गामुळे पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरू प्रवास अतिशय सोपं होणार आहे.



कसा असेल नवा महामार्ग?


नव्या प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाईल. १३० किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असेल. या मार्गावर वेगवान प्रवासासाठी एकूण ८ लेन असतील. या रस्त्याच्या बांधणीसाठी तब्बल १७ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.



पुण्याला रिंग रोडने जोडणार 


तयार होणारा नवीन महामार्ग पुण्याला रिंग रोडने जोडला जाईल आणि पुढे बेंगळुरूपर्यंत विस्तारेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. तसेच अटल सेतूजवळ १४ पदरी रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला रिंग रोडने आणि नंतर बेंगळुरूला जोडला जाईल. जेणेकरुन या रस्त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ५० टक्क्याने कमी होईल.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित