जसा ईदच्या जुलूसाचा आदर होतो, तसाच हिंदूंच्या सणांचा आदर का होत नाही? 

आमदार नितेश राणेंचा सांगलीच्या निषेध सभेत सवाल


सांगली : यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीवर देशभरात ११ ठिकाणी दगडफेक झाली. ही दगडफेक का आणि कशासाठी झाली? अशा प्रकारे दगडफेक कधी ईदच्या जुलूसावर झालेली दाखवावी. काल रात्री १२ वाजेपर्यंत जुलूसमध्ये डॉल्बी वाजत होते. जसा ईदच्या जुलूसाचा आदर होतो तसाच हिंदूंच्या सणांचा आदर का केला जात नाही, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी केला आहे.


हिंदू देवताच्या अपमानाबद्दल सांगलीत काढण्यात आलेल्या निषेध सभेनंतर ते बोलत होते. रामगिरी महाराज हे पैगंबरांबद्दल काय चुकीचे बोलले, असा सवाल त्यांनी यावेळी केला. रामगिरी महाराजांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. झाकीर नाईक बोलला तर चालतो, १०० मौलवी बोलले तर चालते. पण एक हिंदू बोलला तर काहींना राग येतो, असे ही नितेश राणे म्हणाले. आता हिंदू महाराजांनी प्रवचने आणि भाषणे आधी मशिदीत पाठवायची का? हिंदू देवी देवतांचा अपमान आम्ही का सहन करायचा? असे प्रश्न त्यांनी विचारले.



हिंदूत्वाबाबत तडजोड होणार नाही


भाजपचे आमदार मुस्लिम विरोधी वक्तव्य करतात अशी तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, अजित दादांना कुठे तक्रार करायची असेल तर ते करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. हिंदुत्वाबद्दल आमच्याकडून कोणताही तडजोड होणार नाही.


वरिष्ठांशी बोलले तर ते जे सांगतील तसे काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत. पण हिंदुत्वावर तडजोड होणार नाही. मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतात त्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली त्याचा एकदा तरी निषेध करायला हवा होता. ते ज्या दिवशी निषेध, आक्षेप घेतली त्या दिवशी त्यांना तक्रार करण्याची वेळ येणार नाही.

Comments
Add Comment

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पुण्यातून धावणार ३३४ उन्हाळी विशेष ट्रेन

पुणे : परीक्षा संपली की वेध लागतात ते सुट्टीचे, बाहेरगावी फिरायला जायचे, त्यामुळे उन्हाळ्यात रेल्वेवर

बोगस डॉक्टरांचे रॅकेट उद्ध्वस्त करणार; विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये फोफावलेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता राज्य सरकार