भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; परिसरात तणावाचे वातावरण!

Share

भिवंडी : संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) शांततेत पार पडत असताना भिवंडीत (Bhiwandi) रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. भिवंडीमधील वंजार पट्टी नाका परिसरात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुकीमधील गणेश मूर्ती असलेली वाहन आल्या असता सुंदर बेणी कंपाऊंड घुंगट नगर येथील श्री हनुमान मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठ्या तणाव निर्माण झाला. त्यानंतर गणेश भक्ताने रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्या नंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही जणांना जमावा कडून मारहाण झाल्याची घटना घडली.

दरम्यान, या घटनेनंतर तणाव आणखी वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक जखमी असून जमावा कडून झालेल्या दगड फेकीत एक पोलिस सुध्दा जखमी झाला आहे. यानंतर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

26 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago