राज्यात लॉकडाऊन अजिबात लागणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल


युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा आहे, म्हणून आता राज्यात कोविड काळाप्रमाणे लॉकडाऊन लागेल अशा अफवा सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.



काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?


मुख्यमंत्री फडणवीस यांनी इशारा देताना म्हटले की, लॉकडाऊन किंवा इंधन तुटवड्याबाबत खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अगदी फेक व्हॉट्सॲप मेसेज फॉरवर्ड करणे देखील गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले.



देशात इंधनाचा पुरेसा साठा :


मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीत अनेक देशांमध्ये ‘शटडाऊन’सारखी परिस्थिती असली, तरी भारतात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. देशाकडे किमान एक महिना पुरेल इतका इंधनसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.



केंद्र सरकारचाही पुनरुच्चार :


याच मुद्द्यावर हरदीप सिंह पुरी यांनीही नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारचा लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संकटाच्या काळात संयम बाळगणे गरजेचे असून अफवा पसरवणे देशासाठी घातक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.



इंधन दरांबाबत दिलासा :


दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. पेट्रोलवरील शुल्क ₹१३ वरून ₹३ पर्यंत कमी करण्यात आले असून, डिझेलवरील ₹१० प्रति लिटर उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. यामुळे वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भार सर्वसामान्यांवर पडणार नाही, अशी माहिती देण्यात आली.


एकूणच, सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की देशात इंधन तुटवडा किंवा लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांपासून सावध राहून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य