Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्या पिंपरी चिंचवड हद्दीतील पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Municipal Corporation) क, फ, ई या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा उद्या १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी बंद राहणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजीचा पाणीपुरवठा अपुरा व कमीदाबाने होणार (Water Supply) असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्र आणि तळवडे नदीजल उपसा केंद्र या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या भोसरी RS2 सबस्टेशन येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ सप्टेंबर रोजीचा वीजपुरवठा सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे क फ आणि ई या क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा सकाळी नियमित वेळेत होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशीचा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.


त्यामुळे सर्व नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती

नऊशे किलो शेंदूर हटवून ऐतिहासिक स्वरूपाचे दर्शन पुणे : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचे सुमारे

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक