CBSC Education : सरकारी शाळांमध्ये लागणार सीबीएससी पॅटर्न; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

दीपक केसरकर यांनी सांगितला आराखडा


मुंबई : सध्या अनेक पालक त्यांच्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या (CBSC Education) शाळांमध्ये शिक्षण देत आहेत. शिक्षणाकडे राज्यातील पालकांचा ओढा वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम सरकारी शाळांवर पडत असल्याचे दिसून येत आहे. सीबीएससी बोर्डातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे. या कारणांमुळे सरकारी शाळाना ओस पडत असल्याने ही बाब लक्षात घेता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात नवा पॅटर्न लागणार असून राज्यातील विद्यार्थ्यांना याचा चांगलाच शैक्षणिक फायदा होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएससी बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य शिक्षण मंडळाची मुले मागे पडू नयेत, यासाठी शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी अभ्यास पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे आता राज्य शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्डा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.



काय म्हणाले दीपक केसरकर?


एका पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केला असल्याचे म्हटले आहे. सीबीएससी शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात. त्यामुळे आता त्या शाळाप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, सीबीएससी पॅटर्न असला तरीही अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच याआधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता. परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय निवडणे बंधनकारक असणार आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मायक्रोसॉफ्टसोबत १७ अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार; आशियातील सर्वात मोठा 'GCC' प्रकल्प महाराष्ट्रात

नागपूर : महाराष्ट्र हे गुंतवणुकीच्या बाबतीत देशात एक नंबरचे राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्याचे

भास्कर जाधव एकटे असल्यावर वेगळे बोलतात, आदित्य ठाकरे असल्यावर वेगळ्या टोनमध्ये बोलतात!

मंत्री नितेश राणेंची टोलेबाजी; मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनासाठी लवकरच बैठक घेणार नागपूर : हिवाळी

पहिली ते १२वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात शिवरायांचा इतिहास समाविष्ट करणार

राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात

विधानभवनातील कर्मचाऱ्यांकडून विनापडताळणी ‘पास’ वितरण; गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना थेट लॉबीत प्रवेश

विशेष समितीच्या अहवालातील गंभीर निरीक्षण; आव्हाड-पडळकर समर्थकांच्या राड्याप्रकरणी अहवाल सादर नागपूर :

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिजात भ्रष्टाचार

ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यांत सादर करा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश नागपूर :

महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन पोलिस चौकी उघडलेल्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करा राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत राज्यस्तर गठीत