मुंबई : गणेश विसर्जनाचा उत्साही आणि भक्तिमय सोहळा यंदा राज्यभरात अनेक दुर्दैवी घटनांमुळे गालबोट लागून संपला. विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, त्यामुळे हा उत्सव दुःखमय झाला आहे.
धुळ्यातील चितोड येथे मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत तीन बालकांचा मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने अचानक वाहन सुरू केल्याने हे बालक ट्रॅक्टरखाली चिरडले गेले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील वालदेवी नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे हे दोन युवक नदीतील एका खड्ड्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जनादरम्यान तीन जण पूर्णा नदीपात्रात वाहून गेले. मयूर ठाकरे आणि अमोल ठाकरे यांचा यात समावेश आहे. दारापूर येथे २७ वर्षीय राजेश पवार हा युवक देखील पाण्यात बुडाला.
अहमदनगर जिल्ह्यातील विळद गावातील साकळाई तलावात गणपती विसर्जन करताना दोन युवकांचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला. अजिंक्य नवले (१६) आणि केतन शिंदे (१८) अशी मृतांची नावे आहेत.
जिंतूर तालुक्यात गणेश विसर्जनावेळी करपरा नदीत १३ वर्षीय भागवत अंभोरे वाहून गेला. तसेच, जिंतूर शहरात डीजेच्या आवाजामुळे ३७ वर्षीय संदीप कदम यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.
इंदापूरच्या निरा नरसिंहपुर येथे विसर्जनासाठी आलेला अनिकेत कुलकर्णी हा युवक नीरा नदीत बुडाला. अकोल्यातही म्हैसांग येथे गणेश विसर्जनावेळी १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…