Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या 'या' गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे. या अशा वातावरणात जशी उन्हापासून डोक्याची आणि त्वचेची काळजी घेतो तशीच डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. बरेच लोक उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस घालतात. सर्वच सनग्लासेस डोळ्यांचे रक्षण करण्यास सक्षम असतात असे नाही. काही जण संधीचा गैरफायदा घेऊन सनग्लासच्या नावाखाली निकृष्ट गॉगल विकण्याचाही उद्योग करतात. यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने सनग्लासेस घेणे हिताचे आहे.

उन्हाळ्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. अशा परिस्थितीत डोळे चोळल्याने डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. सनग्लासेस डोळ्यांना सूर्याच्या तीव्र प्रकाशापासून वाचवतात. पण लोकांना हे माहित नसतं की कोणता सनग्लास घ्यायला पाहिजे. ज्यामुळे ते चुकीचा चष्मा निवडतात. यामुळे आराम मिळण्याऐवजी डोळ्यांना इजा होते.


कोणते सनग्लासेस घालावे?


उन्हाळ्यात सूर्यप्रकाश खूप प्रखर असतो. तेजस्वी सूर्यप्रकाशात अतिनील किरणे देखील असतात. या किरणांमुळे डोळ्यांच्या आरोग्याला गंभीर नुकसान होते. या किरणांपासून बचाव करण्यासाठी, चांगल्या दर्जाचे यूव्ही संरक्षित सनग्लासेस वापरावेत. सनग्लासेस खरेदी करताना, तुम्ही ते पूर्णपणे तपासले पाहिजेत. असे अनेक सनग्लासेस आहेत जे फक्त दाखवण्यासाठी आहेत. असे सनग्लासेस घालण्याचा काही फायदा नाही. यासोबतच, योग्य फ्रेम निवडणे देखील महत्त्वाचे आहे. फ्रेम तुमच्या चेहऱ्यावर चांगली दिसली पाहिजे आणि तुमचे डोळे व्यवस्थित झाकले पाहिजेत.
Comments
Add Comment

Arijit Singh Comeback : 'आवारापन २' मधून अरिजीत सिंह करणार पुनरागमन

मुंबई : लोकप्रिय गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) लवकरच प्लेबॅक सिंगिंगमध्ये पुनरागमन करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांचे

Ramayana Part 1 Trailer : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर रिलीज होण्याआधीच लीक; निर्मात्यांनी उचलले 'हे' कठोर पाऊल!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत असलेल्या 'रामायण: पार्ट १' (Ramayana Part 1) या चित्रपटाची

Salman Khan : सलमान खानच्या तब्येतीला काय झालं ? चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल

Saamana Movie : 'सामना'चा ५० वर्षांनंतरही तोच दबदबा! चित्रपटगृह हाऊसफुल

- सामनामध्ये आजही प्रेक्षकांना खेचून आणण्याची ताकद - आशिष शेलार मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकृती

Ek Hota Maalin Trailer : 'एक होतं माळीण' चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

मुंबई (Mumbai): काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन गाडल्या गेलेल्या माळीण गावाचा थरार आता मोठ्या पडद्यावर

National Film Awards : 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची दमदार कामगिरी; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले असून