Jio, Airtel Down : अरे! जिओ आणि एअरटेलचे विसर्जन झाले की काय? नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून संताप; तासाभरातच १० हजार तक्रारी

मुंबई : देशभरात गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकांची धूम पाहायला मिळत असताना मुंबईत मात्र एअरटेल आणि जीओचे नेटवर्क ठप्प झाले. मुंबईत (Mumbai) आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मुंबईतील बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक टीव्हीवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर पाहिली जात आहे. मात्र, विसर्जनासाठी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडण्याचा उत्सव सुरू असतानाच मुंबईत जिओचं (Jio) नेटवर्क बंद झाल्याने नेटीझन्सने संताप व्यक्त केला. त्यातच एअरटेल (Airtel) चे नेटवर्कही कोलमडल्याने सोशल मीडियावरही नेटीझन्सकडून चांगलेच ट्रोल करण्यात आले.


नेटवर्क व्यत्ययांमुळे संपूर्ण भारतातील Jio आणि Airtel च्या वापरकर्त्यांना फटका बसला, ज्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पाऊस पडला.


मुंबईत जिओचे नेटवर्क अचानक डाऊन झाल्याने सोशल मीडियातून नेटीझन्सने जिओसह अंबानींना ट्रोल केले. तर, अनेकांनी तक्रारी देखिल दाखल केल्या आहेत. जिओचे नेटवर्क गायब झाल्याने ना फोन कॉल्स सुरू होते, ना इंटरनेट सेवा, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.


सर्वर डाऊन संदर्भात रिपोर्ट देणा-या वेबसाईट डिटेक्टरवर जाऊन माहिती घेतली. त्यानुसार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.१५ नंतर दुपारी १२.३० वाजेपर्यंत नेटवर्क डाऊन झाल्याचे निदर्शनास आले. जिओ सर्व्हर डाऊनबाबत तब्बल १० हजार ३६७ तक्रारी दाखल झाल्या होत्या.


दरम्यान, जिओ नेटवर्कसह जिओ फायबर आणि ब्रॉडबँड सर्व्हिसमध्येही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सोशल मीडियावर नेटीझन्सने याबाबतही उल्लेख केला आहे.


दरम्यान, तासाभरातच जिओ नेटवर्क पुन्हा सुरू झाले असून, याबाबत जिओकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर #Jiodown हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.


दरम्यान, एअरटेल वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटीच्या समस्या देखील आल्या, दुपारी १ वाजेपर्यंत १३० पेक्षा जास्त आउटेज रिपोर्ट दाखल झाले.





आउटेज डेटाच्या विश्लेषणातून असे दिसून आले की Jio-संबंधित तक्रारींपैकी एक महत्त्वपूर्ण भाग 'नो सिग्नल' बद्दल होता, जे अहवालांपैकी ६८ टक्के होते. मोबाइल इंटरनेट समस्यांपैकी १८ टक्के तक्रारी होत्या, तर १४ टक्के तक्रारी JioFibre सेवांशी संबंधित होत्या.


एअरटेल वापरकर्त्यांसाठी, समस्या प्रामुख्याने सिग्नल गमावणे, मोबाइल इंटरनेट व्यत्यय आणि संपूर्ण सेवा ब्लॅकआउटशी संबंधित होत्या.


याउलट, Vodafone Idea आणि BSNL द्वारे ऑपरेट केलेले नेटवर्क सामान्यपणे कार्य करत असल्याचे दिसले. डाउनडिटेक्टरच्या डेटाने सूचित केले आहे की समस्या Jio आणि Airtel वापरकर्त्यांसाठी वेगळ्या होत्या.


अद्यापपर्यंत, Jio किंवा Airtel या दोघांनीही या आउटेजेसच्या कारणासंबंधी विशिष्ट तपशील किंवा निराकरणासाठी अंदाजे टाइमलाइन प्रदान केलेली नाही. वापरकर्ते टेलिकॉम प्रदात्यांच्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत की ते सामान्य सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा करत आहेत.




Comments
Add Comment

Mumbai FDA Raid : अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन महागात; मुंबईतील ३ प्रसिद्ध रेस्टॉरंटवर मोठी कारवाई

मुंबई : राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम (Food Safety Drive) राबवणाऱ्या अन्न

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा बदलणार हवामान; मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) काहीशी उघडीप घेतली असली तरी आता पुन्हा पावसासाठी पोषक

Mumbai Garbage Collection : भायखळा ते शीव पर्यंतचा कचरा उचलण्याची जबाबदारी अखेर मेट्रो वेस्टवर

कचरा खासगीकरणाचा प्रस्ताव दोनदा फेटाळल्यानंतर प्रशासनाने घेतली भूमिका Byculla : एफ उत्तर, एफ दक्षिण आणि ई विभागातील

Tree Pruning : वृक्ष छाटणीचे काम करताना वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती करावी

चेंबूर घटनेनंतर चौकशी समितीने सूचवल्या शिफारशी Mumbai: मुंबईत झाडांची दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता चौकशी

Tree Protection Rules : यापुढे रस्ते कामांसह इतर प्रकल्पांच्या खोदकाता झाडांभोवती जेसीबी,पोकलेन वापरण्यास बंदी

 Mumbai: मुंबईतील कुठल्याही उपयुक्तता संस्थासाठी मग रस्ते असेल वा पर्जन्य जलवाहिनी, मलवाहिनींसह इतर कामांसाठी

BMC News : प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी

मोर्शी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडवरील