आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री!

आपच्या बैठकीत सभागृह नेतेपदी झाली निवड


नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आज, मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत आतिशी मार्लेना यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यावर एकमत झाले. तसेच आपच्या या बैठकीत आतिशी यांची एकमताने सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या घरी नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी सर्व आमदारांची बैठक झाली. यात आतिशी या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कार्यभार सांभाळतील असे ठरले. अरविंद केजरीवाल दुपारी ४.३० वाजता उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्रिपदासह इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल.


दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुरुवातीपासून त्यांचे नाव आघाडीवर होते. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात आणि त्यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. आतिशी या डाव्या विचारसरणीने प्रेरित असून कार्ल मार्क्सचा आणि लेनीन ही दोन नावे जोडून त्यांनी आपल्या नावापुढे मार्लेना हा शब्द जोडला आहे.


आतिशी २०२० मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०२३ साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. आतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहका-यांपैकी एक आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रीय आहेत. सध्या त्या सर्वाधिक ५ मंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत.


केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हापासून संघटना ते सरकार सर्व पातळीवर त्यांनी मोर्चा सांभाळला. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा होती त्यात केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालसह कैलाश गहलोत, गोपाल राय, राघव चड्डा आणि सौरभ भारद्वाज यांच्याही नावाची चर्चा होती.

Comments
Add Comment

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा