आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री!

आपच्या बैठकीत सभागृह नेतेपदी झाली निवड


नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आज, मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत आतिशी मार्लेना यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यावर एकमत झाले. तसेच आपच्या या बैठकीत आतिशी यांची एकमताने सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या घरी नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी सर्व आमदारांची बैठक झाली. यात आतिशी या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कार्यभार सांभाळतील असे ठरले. अरविंद केजरीवाल दुपारी ४.३० वाजता उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्रिपदासह इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल.


दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुरुवातीपासून त्यांचे नाव आघाडीवर होते. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात आणि त्यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. आतिशी या डाव्या विचारसरणीने प्रेरित असून कार्ल मार्क्सचा आणि लेनीन ही दोन नावे जोडून त्यांनी आपल्या नावापुढे मार्लेना हा शब्द जोडला आहे.


आतिशी २०२० मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०२३ साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. आतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहका-यांपैकी एक आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रीय आहेत. सध्या त्या सर्वाधिक ५ मंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत.


केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हापासून संघटना ते सरकार सर्व पातळीवर त्यांनी मोर्चा सांभाळला. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा होती त्यात केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालसह कैलाश गहलोत, गोपाल राय, राघव चड्डा आणि सौरभ भारद्वाज यांच्याही नावाची चर्चा होती.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला