Teachers strike :राज्यातील शाळा २५ सप्टेंबरला बंद, शिक्षकांच्या आंदोलनाची घोषणा

Share

मुंबई : राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी २५ सप्टेंबर रोजी मोठ्या आंदोलनाची (Teachers strike) घोषणा केल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत. शिक्षक सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात एकत्र आले आहेत, शाळांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षक नेमणुकीतील बदल आणि सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती यांचा त्यांनी विरोध केला आहे.

शिक्षणाची गुणवत्ता कमी होण्याची भीती

शिक्षक संघटनांचा आरोप आहे की सरकारच्या नवीन धोरणांमुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा घसरू शकतो. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एकच शिक्षक असणार, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल. शिवाय, कंत्राटी शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

१ लाख ८५ हजार ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

या धोरणांमुळे जवळपास १ लाख ८५ हजार ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, तसेच २९ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांवर परिणाम होऊ शकतो. शिक्षक संघटनांनी सरकारकडे हे नियम रद्द करण्याची मागणी केली आहे, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मोर्चे काढणार

२५ सप्टेंबर रोजी शिक्षक राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मोर्चे काढणार असून, शिक्षण व्यवस्थेतील या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधणार आहेत. सामूहिक रजा आंदोलनाच्या घोषणेने विद्यार्थ्यांसाठी हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांचे हे आंदोलन शिक्षण व्यवस्थेतील अन्यायकारक धोरणांविरोधात आहे आणि समाजातील सर्व घटकांनी या विषयाचे गांभीर्य ओळखले पाहिजे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

3 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

23 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

55 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago