दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर सस्पेन्स, केजरीवालांनी घेतली वन-टू-वन बैठक

नवी दिल्ली: दिल्लीतील पुढील मुख्यमंत्री कोण असणार आहे यावर सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान, मंगळवारी १७ सप्टेंबरला याचे चित्र स्पष्ट होईल. पुढील मुख्यमंत्रीपदाच्या नावावर मोहोर लावण्यासाठी सोमवारी आम आदमी पक्षाच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की पुढील मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा उद्या केली जाईल.



मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली होती बैठक


सौरभ भारद्वाज म्हणाले, आज मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांनी बैठक बोलावली होती. एलजी साहेबांकडून मंगळवार संध्याकाळपर्यंतचा वेळ मिळाला आहे. नव्या मुख्यमंत्र्‍यांच्या नावावर आज चर्चा झाली.काल मुख्यमंत्र्‍यांनी घोषणा केली होती की ते मंगळवारी राजीनामा देतील. आज कॅबिनेट बैठकीत ते उपस्थित होे. नेत्यांशी आणि मंत्र्यांसोबत नव्या मुख्यमंत्रीपाबाबत चर्चा करण्यात आली आणि फीडबॅक घेतला.



मंत्र्यांसोबत झाली वन टू वन मीटिंग


यासोबतच ते म्हणाले की सीएमची मंत्र्यांसोबत वन टू वन मीटिंग झाली. वन टू वन मीटिंगमागचे कारण हे की कोणालाही एकमेकांनी सुचवलेले नाव समजणार नाही.



मुख्यमंत्री केजरीवालांनी केली होती राजीनाम्याची घोषणा


मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता होईल.यात नव्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर चर्चा होईल. आबकारी निती प्रकरणात जामीनावर तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी घोषणा केली की ते ४८ तासांच्या आत राजीनामा देतील आणि दिल्लीत लवकर निवडणुकीची मागणी करतील.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच