अर्जुन तेंडुलकरचा कहर, ९ विकेट घेत संघाला दिला विजय मिळवून

  95

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर(arjun tendulkar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने मैदानावर कहर करताना गोलंदाजीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाज अर्जुन यावेळेस कर्नाटकमध्ये डॉक्टर थिमप्पिया मेमोरियन स्पर्धेत खेळत आहे. अर्जुन स्पर्धेत गोवा संघाकडून खेळत आहे.


अर्जुनने KSCA-XIविरुद्ध कहर करत सामन्यात ९ विकेट घेत संघाला एक डाव आणि १८९ धावांनी शानदार विजय मिळवला. अर्जुनने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सामन्याच्या पहिल्या डावात ४१ धावा देत ५ विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात ५५ धावा देत ४ विकेट घेत विरोधी पक्षाला ढेर केले.


अर्जुनसाठी पुढील महिन्यापासून सुरू होत असलेला रणजी हंगाम खूप महत्त्वाचा असेल. यात त्याने गोव्यासाठी चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाठी पुढील रस्ता सोपा होईल.


अर्जुनने फर्स्ट क्लासमध्ये १३ सामने खेळलेत यात २१ विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीत अर्जुनने जबरदस्त कामगिरी केली आणि एक शतक ठोकले. त्याने ४८१ धावा केल्या.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता