Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी!

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर गणपती उत्सव संपल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेश विसर्जनानंतर हजारो प्रवासी परतत असताना रत्नागिरी ते रायगड जिल्ह्यापर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, मुसळधार पाऊस, आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.


इंदापूर ते कोलाडदरम्यान २३ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड तासांहून अधिक वेळ लागत आहे. कोकणातील खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने वाहने मुंगीच्या गतीने सरकत आहेत. याशिवाय, अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणखीनच तीव्र झाली आहे.


एसटी महामंडळाने २,५५३ अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली आहे, मात्र ती देखील अपुरी ठरत आहे. कोकण रेल्वेने ३०० हून अधिक विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी त्या प्रवाशांची गरज भागवण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे एसटी स्थानकांवर आणि रेल्वे स्टेशनांवरही प्रचंड गर्दी झाली आहे.


या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास वृद्ध, महिला, आणि लहान मुलांना होत आहे. चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, अनेकांना मुंबईपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांचे हाडे अक्षरशः खिळखिळी होत आहेत.


परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या