Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी!

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर गणपती उत्सव संपल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेश विसर्जनानंतर हजारो प्रवासी परतत असताना रत्नागिरी ते रायगड जिल्ह्यापर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, मुसळधार पाऊस, आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.


इंदापूर ते कोलाडदरम्यान २३ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड तासांहून अधिक वेळ लागत आहे. कोकणातील खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने वाहने मुंगीच्या गतीने सरकत आहेत. याशिवाय, अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणखीनच तीव्र झाली आहे.


एसटी महामंडळाने २,५५३ अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली आहे, मात्र ती देखील अपुरी ठरत आहे. कोकण रेल्वेने ३०० हून अधिक विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी त्या प्रवाशांची गरज भागवण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे एसटी स्थानकांवर आणि रेल्वे स्टेशनांवरही प्रचंड गर्दी झाली आहे.


या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास वृद्ध, महिला, आणि लहान मुलांना होत आहे. चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, अनेकांना मुंबईपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांचे हाडे अक्षरशः खिळखिळी होत आहेत.


परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Devendra Fadnavis : जातपडताळणी समितीच्या कामकाजात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही!

मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कोणत्याही मंत्र्याने जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द