Nitesh Rane : संजय राऊत आणि त्याच्या मालकाने शरिरातील रक्त भगवं आहे की हिरवं याची तपासणी केली पाहिजे!

  92

आमदार नितेश राणे यांची विरोधकांवर बोचरी टीका


मुंबई : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे भाषण सुरु असताना हनुमान चालिसा सुरु झाली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसाचा आवाज कमी करायला सांगितला. तसेच नवनीत राणा यांनी नाशिकमध्ये येऊन छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसा म्हणावी, या गोष्टीवर संजय राऊतने (Sanjay Raut) धर्मावर भाष्य करत विधान मांडले होते. त्या विधानाला भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांवर घणाघात केला आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक धर्माला आणि व्यक्तीला समान न्याय मिळाला पाहिजे, अशी मान्यता आहे. पण तरीही हिंदुना वेगळा न्याय आणि मुस्लिम धर्मांना वेगळा न्याय का? असा प्रश्न भाजपाकडून वारंवार विचारला जात आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा विषय हाच आहे की, जो न्याय अन्य धर्माला लावला जातो तोच न्याय हनुमान चालिसाला लावला असता तर विरोधकांकडे हिंदुत्ववादी विचारासारख्या कार्यकर्त्यावर टिका करण्याची वेळच आली नसती. छगन भुजबळ यांनी मशिदीतून पाच वेळा वाजणाऱ्या भोंगाबाबत आवाज उचलला असता व त्यानंतर हनुमान चालिसाबद्दल बोलले असते तर त्यांचा मुद्दा सगळ्यांना पटला असता. म्हणूनच इथे हिंदुना वेगळा न्याय आणि मुस्लिम धर्मांना वेगळा न्याय लावला जातो, असा आक्षेप भाजपा पक्षाकडून केला जात असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.


त्याचबरोबर हिंदुत्ववादीसाठी लढणारे नवनीत राणा आणि छगन भुजबळ यांची सर्वांसमोर जाऊन हनुमान चालिसा बोलण्याबाबत त्यांची हिंमत काढणाऱ्या माणसाने स्वत: हिंदू धर्म सोडला आहे, हे स्पष्ट झाले आहे. नवनीत राणा निश्चित पद्धतीने हिंदुत्ववादीसाठी कार्य करत आहेत. पण दुसऱ्याने हनुमान चालिसा वाजवावी आणि संजय राजाराम राऊतने अजाणतेसमोर जाऊन नतमस्तक व्हावं हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे संजय राऊत आणि त्याचा मालकाने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या शरिरातील रक्त भगवं आहे की हिरवं झालं त्याची रक्त तपासणी करायची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या