मुंबई : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे भाषण सुरु असताना हनुमान चालिसा सुरु झाली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसाचा आवाज कमी करायला सांगितला. तसेच नवनीत राणा यांनी नाशिकमध्ये येऊन छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसा म्हणावी, या गोष्टीवर संजय राऊतने (Sanjay Raut) धर्मावर भाष्य करत विधान मांडले होते. त्या विधानाला भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांवर घणाघात केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक धर्माला आणि व्यक्तीला समान न्याय मिळाला पाहिजे, अशी मान्यता आहे. पण तरीही हिंदुना वेगळा न्याय आणि मुस्लिम धर्मांना वेगळा न्याय का? असा प्रश्न भाजपाकडून वारंवार विचारला जात आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा विषय हाच आहे की, जो न्याय अन्य धर्माला लावला जातो तोच न्याय हनुमान चालिसाला लावला असता तर विरोधकांकडे हिंदुत्ववादी विचारासारख्या कार्यकर्त्यावर टिका करण्याची वेळच आली नसती. छगन भुजबळ यांनी मशिदीतून पाच वेळा वाजणाऱ्या भोंगाबाबत आवाज उचलला असता व त्यानंतर हनुमान चालिसाबद्दल बोलले असते तर त्यांचा मुद्दा सगळ्यांना पटला असता. म्हणूनच इथे हिंदुना वेगळा न्याय आणि मुस्लिम धर्मांना वेगळा न्याय लावला जातो, असा आक्षेप भाजपा पक्षाकडून केला जात असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.
त्याचबरोबर हिंदुत्ववादीसाठी लढणारे नवनीत राणा आणि छगन भुजबळ यांची सर्वांसमोर जाऊन हनुमान चालिसा बोलण्याबाबत त्यांची हिंमत काढणाऱ्या माणसाने स्वत: हिंदू धर्म सोडला आहे, हे स्पष्ट झाले आहे. नवनीत राणा निश्चित पद्धतीने हिंदुत्ववादीसाठी कार्य करत आहेत. पण दुसऱ्याने हनुमान चालिसा वाजवावी आणि संजय राजाराम राऊतने अजाणतेसमोर जाऊन नतमस्तक व्हावं हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे संजय राऊत आणि त्याचा मालकाने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या शरिरातील रक्त भगवं आहे की हिरवं झालं त्याची रक्त तपासणी करायची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…