Dengue : रायगडात डेंग्यू वाढल्याने आरोग्य विभागाची उडाली झोप!

दररोज दहा नवीन रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील (Raigad) अलिबाग,पेण,पनवेलमधील ग्रामीण भागात सध्या डेंग्यूचे (Dengue) रुग्ण सापडत असून,मागील काही दिवसांपासून येथे डेंग्यूने थैमान घातले आहे.डेंग्यूला रोखण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले असून, जिल्ह्यात दररोज नवीन दहा रुग्ण सापडत असल्याने ऐन गणेशोत्सवात आरोग्य विभागाची (Health Department) पार झोपच उडाली आहे.


रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन,कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादूर्भावदेखील वाढू लागला आहे. जिल्ह्यातील पनवेल,अलिबागबरोबरच आता पेण तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. हिवताप विभागामार्फत रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जात आहे.


रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कळंबोली,खारघर, नवीन पनवेल,सुकापूर,विचुंबे तसेच पनवेल शहराबरोबरच पेणमधील रावे,अलिबागमधील भाल, साखर या भागात एका दिवसात ३६ रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण जिल्हा रुग्णालयासह पेणमधील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची देखील धावाधाव सुरू झाली आहे. ज्याठिकाणी रुग्ण सापडत आहेत, त्याठिकाणी यंत्रणेद्वारे तपासणी करून परिसरात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. उपाययोजना करूनदेखील शहराबरोबरच आता डेंग्यूने ग्रामीण भागांतदेखील शिरकाव केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


डेंग्यू रोखण्यासाठी काय कराल


घराच्या परिसरात अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत. सखल भागात साचलेले पाणी काढून तो भाग कोरडा करावा. खिडक्यांना जाळ्या बसवून घरात डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत, यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस