Dengue : रायगडात डेंग्यू वाढल्याने आरोग्य विभागाची उडाली झोप!

दररोज दहा नवीन रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील (Raigad) अलिबाग,पेण,पनवेलमधील ग्रामीण भागात सध्या डेंग्यूचे (Dengue) रुग्ण सापडत असून,मागील काही दिवसांपासून येथे डेंग्यूने थैमान घातले आहे.डेंग्यूला रोखण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले असून, जिल्ह्यात दररोज नवीन दहा रुग्ण सापडत असल्याने ऐन गणेशोत्सवात आरोग्य विभागाची (Health Department) पार झोपच उडाली आहे.


रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन,कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादूर्भावदेखील वाढू लागला आहे. जिल्ह्यातील पनवेल,अलिबागबरोबरच आता पेण तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. हिवताप विभागामार्फत रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जात आहे.


रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कळंबोली,खारघर, नवीन पनवेल,सुकापूर,विचुंबे तसेच पनवेल शहराबरोबरच पेणमधील रावे,अलिबागमधील भाल, साखर या भागात एका दिवसात ३६ रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण जिल्हा रुग्णालयासह पेणमधील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची देखील धावाधाव सुरू झाली आहे. ज्याठिकाणी रुग्ण सापडत आहेत, त्याठिकाणी यंत्रणेद्वारे तपासणी करून परिसरात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. उपाययोजना करूनदेखील शहराबरोबरच आता डेंग्यूने ग्रामीण भागांतदेखील शिरकाव केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


डेंग्यू रोखण्यासाठी काय कराल


घराच्या परिसरात अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत. सखल भागात साचलेले पाणी काढून तो भाग कोरडा करावा. खिडक्यांना जाळ्या बसवून घरात डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत, यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या