Eid Holiday : ईद-ए-मिलाद सुट्टीच्या तारखेत बदल; सरकारचा मोठा निर्णय!

  170

मुंबई : सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा 'ईद-ए-मिलाद' (Eid a Milad) हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका आणि शाळांना सुट्टी (Holiday) असते. मात्र या सार्वजनिक सुट्टीबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी रविवार आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी अशा सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे अनेकांनी बनवलेले हॉलिडेचे प्लॅनिंग काहीसे बिघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


'ईद मिलाद उन- नबी' यासाठी राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली होती. मात्र १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय १८ सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करून १८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी १६ ऐवजी १९ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या