Eid Holiday : ईद-ए-मिलाद सुट्टीच्या तारखेत बदल; सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई : सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा 'ईद-ए-मिलाद' (Eid a Milad) हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका आणि शाळांना सुट्टी (Holiday) असते. मात्र या सार्वजनिक सुट्टीबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी रविवार आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी अशा सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे अनेकांनी बनवलेले हॉलिडेचे प्लॅनिंग काहीसे बिघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


'ईद मिलाद उन- नबी' यासाठी राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली होती. मात्र १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय १८ सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करून १८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी १६ ऐवजी १९ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी