मुंबई : सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ‘ईद-ए-मिलाद’ (Eid a Milad) हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका आणि शाळांना सुट्टी (Holiday) असते. मात्र या सार्वजनिक सुट्टीबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी रविवार आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी अशा सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे अनेकांनी बनवलेले हॉलिडेचे प्लॅनिंग काहीसे बिघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘ईद मिलाद उन- नबी’ यासाठी राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली होती. मात्र १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय १८ सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करून १८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी १६ ऐवजी १९ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…