Pune News : रेल्वे ट्रॅकवरही आता सीसीटीव्हीची नजर

पुणे : रेल्वे ट्रॅकवर दगड रचून ठेवणे किंवा अन्य प्रकारे रेल्वे ट्रॅकवर वस्तू ठेवून घातपात करण्याचा कट रचल्याच्या घटना मागील काही महिन्यांत समोर आल्या आहेत. यातून रेल्वे अपघात होण्याचा धोका आहे. याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षितेसाठी संशयित ठिकाणी रेल्वे प्रशासनाला सीसीटीव्ही बसविण्याचा सूचना दिल्या आहे. त्यानुसार रेल्वेच्या पुणे विभागात ट्रॅकवर २० ठिकाणी सीसीटीव्हीa कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा विभागाकडून देण्यात आली.


केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसोबत रेल्वे सुरक्षा बलाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये गुप्तचर यंत्रणेने रेल्वे प्रशासनाला पुणे विभागातील काही संशयित ठिकाणे सांगितली आहेत. त्याठिकाणी घातपाताची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणांची विशेष काळजी घेण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे. संवेदनशील भागातून जाणार्‍या ट्रॅकची माहितीही गुप्तचर यंत्रणेकडून दिली आहे.


पुणे परिसरात जवळपास २० संशयित ठिकाणी आढळली असून, या २० ठिकाणांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. आता, लवकरच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून जेणेकरून रेल्वे संदर्भातील घातपाताच्या कृतींना वेळीच आळा घालता येईल. तसेच, या संवेदनशील भागातील गस्त वाढवण्यात येणार असून विविध स्तरावर सुरक्षा संदर्भातील उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला