PM Awas Yojana : मुंबईच्या डबेवाल्यांवर गणरायाची कृपा! राज्य सरकारकडून मिळाली आनंदवार्ता

पीएम आवास योजनेतून मिळणार हक्काची घरे


मुंबई : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबईच्या डबेवाल्यांसाठी (Mumbai Dabewala) आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सभागृहात पीएम आवास योजनेतून डबेवाल्यांना घरे दिली जाणार असे आश्वासन दिले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळावी यासाठी पाठपुरावा देखील केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आता लवकरच डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत.


आज सकाळी मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेने देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंज्यस करार करण्यात आला. त्यानुसार डबेवाल्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) स्वत:च्या हक्काचे घर मिळणार आहे.


तसेच मुंबई डबेवाल्यांबरोबरच चर्मकार समाजातील बांधवांसाठी देखील या योजनेत घरे दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रियालिटी ३० एकर जागा देणार असून नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर घरांचे बांधकाम होणार आहे. ५०० चौरस फुटांच्या १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. ही घरे डबेवाले आणि चर्मकार समाजाला २५ लाखात दिली जाणार आहेत. त्यामुळे येत्या तीन वर्षांत डबेवाला आणि चर्मकार बंधू यांचे स्वतःच्या घराचं पूर्ण होणार आहे.

Comments
Add Comment

एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच बैठकीत बांग्लादेशी विरोधात ऍक्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईमध्ये बोगस

मुंबईत आता फेरीवाल्यांची झाडाझडती

महापौरांच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांचे ओळखपत्रे आणि कागदपत्रे तपासणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे सभागृह उबाठाच्या काळात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिराने

महाराष्ट्रातून थंडी जाणार पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, कसं असेल हवामान ?

मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची

कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे

मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘हाय-टेक’ कॅप्टन; प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणेसाठी प्रयत्न

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश