PM Awas Yojana : मुंबईच्या डबेवाल्यांवर गणरायाची कृपा! राज्य सरकारकडून मिळाली आनंदवार्ता

पीएम आवास योजनेतून मिळणार हक्काची घरे


मुंबई : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबईच्या डबेवाल्यांसाठी (Mumbai Dabewala) आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सभागृहात पीएम आवास योजनेतून डबेवाल्यांना घरे दिली जाणार असे आश्वासन दिले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळावी यासाठी पाठपुरावा देखील केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आता लवकरच डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत.


आज सकाळी मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेने देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंज्यस करार करण्यात आला. त्यानुसार डबेवाल्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) स्वत:च्या हक्काचे घर मिळणार आहे.


तसेच मुंबई डबेवाल्यांबरोबरच चर्मकार समाजातील बांधवांसाठी देखील या योजनेत घरे दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रियालिटी ३० एकर जागा देणार असून नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर घरांचे बांधकाम होणार आहे. ५०० चौरस फुटांच्या १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. ही घरे डबेवाले आणि चर्मकार समाजाला २५ लाखात दिली जाणार आहेत. त्यामुळे येत्या तीन वर्षांत डबेवाला आणि चर्मकार बंधू यांचे स्वतःच्या घराचं पूर्ण होणार आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)