PM Awas Yojana : मुंबईच्या डबेवाल्यांवर गणरायाची कृपा! राज्य सरकारकडून मिळाली आनंदवार्ता

पीएम आवास योजनेतून मिळणार हक्काची घरे


मुंबई : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबईच्या डबेवाल्यांसाठी (Mumbai Dabewala) आनंदाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सभागृहात पीएम आवास योजनेतून डबेवाल्यांना घरे दिली जाणार असे आश्वासन दिले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळावी यासाठी पाठपुरावा देखील केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आता लवकरच डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत.


आज सकाळी मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेने देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंज्यस करार करण्यात आला. त्यानुसार डबेवाल्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) स्वत:च्या हक्काचे घर मिळणार आहे.


तसेच मुंबई डबेवाल्यांबरोबरच चर्मकार समाजातील बांधवांसाठी देखील या योजनेत घरे दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रियालिटी ३० एकर जागा देणार असून नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर घरांचे बांधकाम होणार आहे. ५०० चौरस फुटांच्या १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. ही घरे डबेवाले आणि चर्मकार समाजाला २५ लाखात दिली जाणार आहेत. त्यामुळे येत्या तीन वर्षांत डबेवाला आणि चर्मकार बंधू यांचे स्वतःच्या घराचं पूर्ण होणार आहे.

Comments
Add Comment

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन

प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्‍यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्‍य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम आज मंगळवार, ९ डिसेंबर