मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्णत्वास येत असून मुंबईकरांचा प्रवासही वेगवान झाला आहे. अशातच पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्यासाठी प्रशासनाने कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे (Mumbai Coastal Road) काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाले असून आज या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या काही मिनिटांत पार करु शकणार आहे. तसेच वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास १२ मिनिटांत होणार असल्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.
दरम्यान, वांद्रे-वरळी सी लिंक कोस्टल रोडचे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिपक केसरकर, तसेच मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…