नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून सुरू

नागपूर : मध्य व दक्षिण भारतातील प्रमुख कनेक्टिव्हिटीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सेवा १५ सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे. १३० किमी प्रति तास गतीने धावणारी ही १६ डब्यांची अत्याधुनिक ट्रेन नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावेल.


नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस पाच प्रमुख स्थानकांवर थांबेल, ज्यामध्ये चंद्रपूर जिल्हा समाविष्ट आहे. चंद्रपूर आणि बल्लारपूर स्थानकावरून प्रवाशांना विशेष सुविधा मिळतील. या सेवेची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्याची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे.


यापूर्वी जानेवारी २०२३ मध्ये या ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. आता दररोज धावणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार, ट्रेन नागपूर येथून सकाळी ५:०० वाजता सुटेल.


सेवाग्राम: ५:५०, चंद्रपूर: ७:२०, बल्लारपूर: ७:४०,


रामगुडंम, ९:१०, काजीपेठ: १०:०६, सिकंदराबाद: १२:१५ वाजतो पोहचेल.


सिकंदराबादहून परतीचा प्रवास रात्री १:०० वाजता सुरू होईल आणि ट्रेन सकाळी ८:२० वाजता नागपूरला पोहोचेल.


या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी प्रवास अधिक आरामदायक आणि जलद होईल. विशेषतः चंद्रपूरसह इतर स्थानकांवरील थांब्यामुळे स्थानिक प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे, असे नमो रेल्वे वेलफेयर पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या