नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून सुरू

  108

नागपूर : मध्य व दक्षिण भारतातील प्रमुख कनेक्टिव्हिटीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सेवा १५ सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे. १३० किमी प्रति तास गतीने धावणारी ही १६ डब्यांची अत्याधुनिक ट्रेन नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावेल.


नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस पाच प्रमुख स्थानकांवर थांबेल, ज्यामध्ये चंद्रपूर जिल्हा समाविष्ट आहे. चंद्रपूर आणि बल्लारपूर स्थानकावरून प्रवाशांना विशेष सुविधा मिळतील. या सेवेची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्याची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे.


यापूर्वी जानेवारी २०२३ मध्ये या ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. आता दररोज धावणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार, ट्रेन नागपूर येथून सकाळी ५:०० वाजता सुटेल.


सेवाग्राम: ५:५०, चंद्रपूर: ७:२०, बल्लारपूर: ७:४०,


रामगुडंम, ९:१०, काजीपेठ: १०:०६, सिकंदराबाद: १२:१५ वाजतो पोहचेल.


सिकंदराबादहून परतीचा प्रवास रात्री १:०० वाजता सुरू होईल आणि ट्रेन सकाळी ८:२० वाजता नागपूरला पोहोचेल.


या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी प्रवास अधिक आरामदायक आणि जलद होईल. विशेषतः चंद्रपूरसह इतर स्थानकांवरील थांब्यामुळे स्थानिक प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे, असे नमो रेल्वे वेलफेयर पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने