Lalbaug Accident : लालबाग परिसरात पुन्हा अपघात! महिलेला बेस्ट बसची जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

मुंबई : मागील आठवड्यात मुंबईतील लालबाग परिसरात (Lalbaug Accident) बेस्ट बसचा भीषण अपघात (Best Bus Accident) झाल्याची घटना घडली होती. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला होता. तर ८ जण गंभीर जखमी झाले होते. एका मद्यधुंद प्रवाशासोबत झालेल्या बाचाबाचीमुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने अनेक वाहनांना धडक देत ९ जणांना चिरडले होते. लालबागमधील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग परिसरातील गणेशगल्ली (Ganeshgalli) येथे एका बेस्ट बसने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे ५ वाजून ३० मिनिट वाजेच्या दरम्यान बाप्पाच्या दर्शनसाठी आलेल्या या महिलाला बेस्टच्या बसने आधी धडक दिली. धक्का लागल्यामुळे महिला पडली व तिच्या पायावरुन बस गेली.


सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर गणेशभक्तांसह इतर नागरिकांनी बस रोखून धरली आणि चालकाला चांगलाच चाप दिला.


दरम्यान, काल देखील गोरेगावमध्ये बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या घटनेत एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बेस्ट बसच्या वाढत्या अपघातामुळे नागरिकांकडून बेस्ट प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.