Lalbaug Accident : लालबाग परिसरात पुन्हा अपघात! महिलेला बेस्ट बसची जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

  156

मुंबई : मागील आठवड्यात मुंबईतील लालबाग परिसरात (Lalbaug Accident) बेस्ट बसचा भीषण अपघात (Best Bus Accident) झाल्याची घटना घडली होती. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला होता. तर ८ जण गंभीर जखमी झाले होते. एका मद्यधुंद प्रवाशासोबत झालेल्या बाचाबाचीमुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने अनेक वाहनांना धडक देत ९ जणांना चिरडले होते. लालबागमधील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग परिसरातील गणेशगल्ली (Ganeshgalli) येथे एका बेस्ट बसने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे ५ वाजून ३० मिनिट वाजेच्या दरम्यान बाप्पाच्या दर्शनसाठी आलेल्या या महिलाला बेस्टच्या बसने आधी धडक दिली. धक्का लागल्यामुळे महिला पडली व तिच्या पायावरुन बस गेली.


सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर गणेशभक्तांसह इतर नागरिकांनी बस रोखून धरली आणि चालकाला चांगलाच चाप दिला.


दरम्यान, काल देखील गोरेगावमध्ये बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या घटनेत एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बेस्ट बसच्या वाढत्या अपघातामुळे नागरिकांकडून बेस्ट प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना