Flower Price Hike : ऐन गणेशोत्सवात फुलांचे भाव गगनाला भिडले!

सातारा : गौरी गणपतीचा (Gauri Ganpati) सण म्हणले की सर्वच आबाला होताना एक वेगळाच उत्साह येतो. उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमात पूजेसाठी फुलांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. गौरी आणि गणपतीसाठी लागणारी विविध सुवासिक तसेच देश-विदेशातील रंगबिरंगी फुलांचे भाव मात्र या उत्सवामुळे गगनाला भेटले आहेत.


सातारा (Satara) शहरातील राजवाडा परिसरात मोती चौक ते राजवाडा दरम्यानच्या फुटपात वर सध्या फुलविक्रेत्यांची गर्दी होत आहे. करंजे पेठेत फुलाच्या दुकानांमध्ये सध्या बेंगलोर गुलाब, शेवंती, जांभळी शेवंती, लाल बेंगलोर गुलाबाला विशेष मागणी आहे. ऑस्टर या गुलाबी रंगांच्या फुलांनाही तितकीच मागणी असून सध्या या फुलांचे भाव आठशे रुपये प्रति किलो इतकेच चढे आहेत. मात्र, तरीही नागरिकांना घरोघरी पूजेसाठी तसेच हार बनवण्यासाठी या फुलांना विशेष प्राधान्य दिले जात. गोल्डन येलो आणि गोल्डन ऑरेंज जातीचे झेंडू फुले ही सध्या तीनशे रुपये किलो दराने विकली जात आहे.



हार खरेदीसाठी विशेष गर्दी 


निशिगंधांच्या फुलाचा भाव हजार रुपये प्रति किलो गेल्यामुळे लाल गुलाब, झेंडू तसेच शेवंतीच्या फुलांना व त्यापासून बनवलेल्या हारांना विशेष मागणी आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी तसेच गणपतीसाठी तीन दिवस या हारांना विशेष मागणी असते. मंगळवारी या गौरींचे आगमन झाले असून बुधवारी महाभोजन आणि गुरुवारी घरच्या गणपतीचे या गौरी सोबत विसर्जनही होणार आहे. त्यामुळे सुवासिक सायली आणि कुंदा फुलांच्या गजऱ्यांनाही विशेष मागणी आहे. सध्या हे गजरे तीस ते पन्नास रुपये प्रति नगाने विकले जात आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे