Flower Price Hike : ऐन गणेशोत्सवात फुलांचे भाव गगनाला भिडले!

सातारा : गौरी गणपतीचा (Gauri Ganpati) सण म्हणले की सर्वच आबाला होताना एक वेगळाच उत्साह येतो. उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमात पूजेसाठी फुलांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. गौरी आणि गणपतीसाठी लागणारी विविध सुवासिक तसेच देश-विदेशातील रंगबिरंगी फुलांचे भाव मात्र या उत्सवामुळे गगनाला भेटले आहेत.


सातारा (Satara) शहरातील राजवाडा परिसरात मोती चौक ते राजवाडा दरम्यानच्या फुटपात वर सध्या फुलविक्रेत्यांची गर्दी होत आहे. करंजे पेठेत फुलाच्या दुकानांमध्ये सध्या बेंगलोर गुलाब, शेवंती, जांभळी शेवंती, लाल बेंगलोर गुलाबाला विशेष मागणी आहे. ऑस्टर या गुलाबी रंगांच्या फुलांनाही तितकीच मागणी असून सध्या या फुलांचे भाव आठशे रुपये प्रति किलो इतकेच चढे आहेत. मात्र, तरीही नागरिकांना घरोघरी पूजेसाठी तसेच हार बनवण्यासाठी या फुलांना विशेष प्राधान्य दिले जात. गोल्डन येलो आणि गोल्डन ऑरेंज जातीचे झेंडू फुले ही सध्या तीनशे रुपये किलो दराने विकली जात आहे.



हार खरेदीसाठी विशेष गर्दी 


निशिगंधांच्या फुलाचा भाव हजार रुपये प्रति किलो गेल्यामुळे लाल गुलाब, झेंडू तसेच शेवंतीच्या फुलांना व त्यापासून बनवलेल्या हारांना विशेष मागणी आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी तसेच गणपतीसाठी तीन दिवस या हारांना विशेष मागणी असते. मंगळवारी या गौरींचे आगमन झाले असून बुधवारी महाभोजन आणि गुरुवारी घरच्या गणपतीचे या गौरी सोबत विसर्जनही होणार आहे. त्यामुळे सुवासिक सायली आणि कुंदा फुलांच्या गजऱ्यांनाही विशेष मागणी आहे. सध्या हे गजरे तीस ते पन्नास रुपये प्रति नगाने विकले जात आहेत.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे