Flower Price Hike : ऐन गणेशोत्सवात फुलांचे भाव गगनाला भिडले!

सातारा : गौरी गणपतीचा (Gauri Ganpati) सण म्हणले की सर्वच आबाला होताना एक वेगळाच उत्साह येतो. उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमात पूजेसाठी फुलांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. गौरी आणि गणपतीसाठी लागणारी विविध सुवासिक तसेच देश-विदेशातील रंगबिरंगी फुलांचे भाव मात्र या उत्सवामुळे गगनाला भेटले आहेत.


सातारा (Satara) शहरातील राजवाडा परिसरात मोती चौक ते राजवाडा दरम्यानच्या फुटपात वर सध्या फुलविक्रेत्यांची गर्दी होत आहे. करंजे पेठेत फुलाच्या दुकानांमध्ये सध्या बेंगलोर गुलाब, शेवंती, जांभळी शेवंती, लाल बेंगलोर गुलाबाला विशेष मागणी आहे. ऑस्टर या गुलाबी रंगांच्या फुलांनाही तितकीच मागणी असून सध्या या फुलांचे भाव आठशे रुपये प्रति किलो इतकेच चढे आहेत. मात्र, तरीही नागरिकांना घरोघरी पूजेसाठी तसेच हार बनवण्यासाठी या फुलांना विशेष प्राधान्य दिले जात. गोल्डन येलो आणि गोल्डन ऑरेंज जातीचे झेंडू फुले ही सध्या तीनशे रुपये किलो दराने विकली जात आहे.



हार खरेदीसाठी विशेष गर्दी 


निशिगंधांच्या फुलाचा भाव हजार रुपये प्रति किलो गेल्यामुळे लाल गुलाब, झेंडू तसेच शेवंतीच्या फुलांना व त्यापासून बनवलेल्या हारांना विशेष मागणी आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी तसेच गणपतीसाठी तीन दिवस या हारांना विशेष मागणी असते. मंगळवारी या गौरींचे आगमन झाले असून बुधवारी महाभोजन आणि गुरुवारी घरच्या गणपतीचे या गौरी सोबत विसर्जनही होणार आहे. त्यामुळे सुवासिक सायली आणि कुंदा फुलांच्या गजऱ्यांनाही विशेष मागणी आहे. सध्या हे गजरे तीस ते पन्नास रुपये प्रति नगाने विकले जात आहेत.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,