Astrology: तुम्हाला ३२ दात आहेत का? तर मिळेल हे सुख

मुंबई: विभिन्न शास्त्रानुसार स्वप्न, हाताच्या रेषा इत्यादींबद्दल बरेच काही सांगितले आहे. यातच एक आहे समुद्रशास्त्र. समुद्रशास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या विविध अंगाबद्दल सांगितले आहे.


आपले दात हे शरीराच्या महत्त्वाच्या अंगापैकी एक आहे. जेवण जेवण्यासाठी, चघळण्यासाठी इत्यादी कामे दात करतात. ज्योतिषामध्ये दातांची भूमिका महत्त्वाची आहे. दातांचे महत्त्व आहे की जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्याला दात नसतात. जन्मानंतर तो जसजसा मोठा होत जातो तेव्हा त्याला दात येऊ लागतात.


सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात ३२ दात असतात. मात्र सर्वांनाच ३२ दात असतातच असे नाही. काही लोकांना ३०,२९ आणि २८ दातही असतात. समुद्रशास्त्रामध्ये ३२ दात असणाऱ्यांना चांगले मानले गेले आहे. जाणून घ्या दातांच्या संख्येबाबत काय म्हणते समुद्र शास्त्र



३२ दात असलेले लोक


समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या दातांची संख्या ३२ असते ते खूप भाग्यवान असतात. त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द नेहमी खरे होतात. मग ती चांगली गोष्ट असो वा वाईट. सोबतच हे लोक सत्यवादी असतात. तसेच आपल्या जीवनात ते राजासारखे राहतात. यांच्या जीवनात भौतिक सुखाची कमतरता नसते. दरम्यान, काहींना संपूर्ण ३२ दात नसतात.


समुद्रशास्त्रानुसार दातांची संख्या जितकी कमी तितके जीवनात अधिक त्रास असतात. ३१ दात असलेले लोक भोग विलासमध्ये चतुर असतात. ३० दात असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती सामान्य असते. तसेच त्यांना जीवनात मोठा त्रास होत नाही. म्हणजेच हे लोक सामान्य जीवन व्यतीत करतात. ज्यांना २८ अथवा २९ दात असतात ते जीवनात थोडे दु:खी राहतात. यांना लवकर भाग्याची साथ मिळत नाही.

Comments
Add Comment

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत

INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि

Beed Suicide : लग्नाचा १२ वा दिवस अन् नवरदेवाची आत्महत्या! बायकोच्या डायरीत दडलं होतं 'ते' भयानक सत्य

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत आत्महत्या (Suicide) केल्याच्या

Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)