आज धुव्वाधार! पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : राज्यातील पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार, हवामानविषयक प्रणालीचा परिणाम म्हणून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यासह विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज विदर्भात अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात आणखी दोन दिवस पावासाचे असून पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, वायव्य अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी