Paris Paralympics 2024: पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पदकांचा वर्षाव, पदकतालिकेत भारताची मोठी झेप

  154

मुंबई: पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. ७ सप्टेंबरला पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या नवदीप सिंहने सुवर्णपदक जिंकले. तर महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत भारच्या ट्रॅक अँड फिल्ड खेळाडू सिमरन शर्माने कांस्यपदक पटकावले आहे. या दोन पदकांसह भारताच्या पदकांची संख्या आता २९ झाली आहे.


भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ७ सुवर्ण, ९ रौप्य आण १४ कांस्यपदकांची कमाई केली आहे. भारत पदकतालिकेत सध्या १५ व्या स्थानावर आहे.



इराणी खेळाडूला केले डिसक्वालिफाय


अंतिम सामन्यात नवदीप सिहने दुसऱ्या प्रयत्नात ४७.३२ मीटर दूर भाला फेकला. त्याच्या करिअरमधील हा बोस्ट थ्रो होता. खरंतर या स्पर्धेत इराणचा सादेह सयाह बेत ४७.६४च्या प्रयत्नासह टॉपवर होता. मात्र स्पर्धा संपल्यानंतर त्याला डिसक्वालिफाय करण्यात आले. यामुळे भारतीय खेळाडू नवदीपला फायदा झाला आणि त्याला सुवर्णपदक मिळाले. चीनच्या पेंगजियांग सुनला रौप्य पदक मिळाले.


दुसरीकडे महिलांच्या २०० मीटर स्पर्धेच्या फायनलमध्ये सिमरन शर्माने २४.७५ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत क्युबाच्या ओमारा इलियास डुरंडने सुवर्णपदक पटकावले.तिने ही शर्यत २३.६२ सेकंदाचा वेळ घेतला.


पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. टोकियो पॅराऑलिम्पिक २०२०मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यपदकाची कमाई केली होती. १९ पदकांसह भारताचे ते सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरले होते.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे