Paris Paralympics 2024: पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पदकांचा वर्षाव, पदकतालिकेत भारताची मोठी झेप

मुंबई: पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. ७ सप्टेंबरला पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या नवदीप सिंहने सुवर्णपदक जिंकले. तर महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत भारच्या ट्रॅक अँड फिल्ड खेळाडू सिमरन शर्माने कांस्यपदक पटकावले आहे. या दोन पदकांसह भारताच्या पदकांची संख्या आता २९ झाली आहे.


भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ७ सुवर्ण, ९ रौप्य आण १४ कांस्यपदकांची कमाई केली आहे. भारत पदकतालिकेत सध्या १५ व्या स्थानावर आहे.



इराणी खेळाडूला केले डिसक्वालिफाय


अंतिम सामन्यात नवदीप सिहने दुसऱ्या प्रयत्नात ४७.३२ मीटर दूर भाला फेकला. त्याच्या करिअरमधील हा बोस्ट थ्रो होता. खरंतर या स्पर्धेत इराणचा सादेह सयाह बेत ४७.६४च्या प्रयत्नासह टॉपवर होता. मात्र स्पर्धा संपल्यानंतर त्याला डिसक्वालिफाय करण्यात आले. यामुळे भारतीय खेळाडू नवदीपला फायदा झाला आणि त्याला सुवर्णपदक मिळाले. चीनच्या पेंगजियांग सुनला रौप्य पदक मिळाले.


दुसरीकडे महिलांच्या २०० मीटर स्पर्धेच्या फायनलमध्ये सिमरन शर्माने २४.७५ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत क्युबाच्या ओमारा इलियास डुरंडने सुवर्णपदक पटकावले.तिने ही शर्यत २३.६२ सेकंदाचा वेळ घेतला.


पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. टोकियो पॅराऑलिम्पिक २०२०मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यपदकाची कमाई केली होती. १९ पदकांसह भारताचे ते सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरले होते.

Comments
Add Comment

विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडेतून निवृत्ती घेणार? बीसीसीआयने सांगितले सत्य...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि रोहित

मोहम्मद शमीची निवड न झाल्याने निराशा, निवडकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

नवी दिल्ली: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि

"हे लज्जास्पद आहे" : गौतम गंभीरने हर्षित राणाच्या टीकेवर फटकारलं

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या निवडीवर सध्या

भारत पाकिस्तानचे ज्युनिअर हॉकीपटू आले आमनेसामने आणि घडली 'ही' घटना

मलेशिया : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली. यानंतर आशिया चषक

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार