Ganeshotsav : गणेशोत्सवानिमित्त मेट्रो प्रवासी सेवेच्या वेळेत वाढ

१७ -१८ सप्टेंबरला मेट्रो सलग २४ तास सुरु राहणार


पुणे : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. मेट्रोच्या या सेवेमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. शहरातील गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेरून नागरिक मोठ्या संख्येने पुण्यात येत असतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सुविधेसाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मेट्रोची सेवा मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी (१७ सप्टेंबर) ते १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत असे एकूण २४ तास मेट्रोची सेवा अखंड सुरू राहणार आहे. शनिवार (७ सप्टेंबर) ते सोमवार (९ सप्टेंबर) या दोन दिवसात मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहील. तर, मंगळवार (१० सप्टेंबर) ते सोमवार (१६ सप्टेंबर) या कालावधीत सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
अखंड ४० तास मिळणार सेवा


अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी सहा ते रात्री दहा अशी नियमित सेवा सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दोन दिवसात मेट्रोची अखंड चाळीस तास सेवा सुरू असेल. मेट्रोच्या या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी