Ganeshotsav : गणेशोत्सवानिमित्त मेट्रो प्रवासी सेवेच्या वेळेत वाढ

  35

१७ -१८ सप्टेंबरला मेट्रो सलग २४ तास सुरु राहणार


पुणे : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. मेट्रोच्या या सेवेमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. शहरातील गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेरून नागरिक मोठ्या संख्येने पुण्यात येत असतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सुविधेसाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मेट्रोची सेवा मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी (१७ सप्टेंबर) ते १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत असे एकूण २४ तास मेट्रोची सेवा अखंड सुरू राहणार आहे. शनिवार (७ सप्टेंबर) ते सोमवार (९ सप्टेंबर) या दोन दिवसात मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहील. तर, मंगळवार (१० सप्टेंबर) ते सोमवार (१६ सप्टेंबर) या कालावधीत सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
अखंड ४० तास मिळणार सेवा


अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी सहा ते रात्री दहा अशी नियमित सेवा सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दोन दिवसात मेट्रोची अखंड चाळीस तास सेवा सुरू असेल. मेट्रोच्या या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या