ST Strike : संप करु नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाची घोषणा झाल्याने चाकरमान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (४ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथी गृहात तातडीची बैठक बोलावली आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, एसटी ही गावोगावी पोहोचणारी महत्त्वाची सेवा आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक नागरिक खरेदीसाठी आणि इतर कामांसाठी एसटीवर अवलंबून असतात. त्यामुळे संप टाळा आणि चर्चेतून तोडगा काढू.


एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता, आणि इतर वित्तीय मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांसाठी ४८४९ कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होईल असे आश्वासन दिले आहे आणि आजच्या बैठकीत तातडीचा तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया