बांग्लादेश मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका

मुंबई: भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दिलीप ट्रॉफी २०२४-२५चया पहिल्या टप्प्यातून बाहेर गेला आहे. त्याला बुची बाबू स्पर्धेत गेल्या आठवड्यात मुंबईसाठी खेळताना हाताला दुखापत झाली होती. दरम्यान, त्याला आता आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. तो फिटनेस प्रक्रियेतून जाण्यासाठी नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये उपस्थित आहे.


सूर्यकुमार यादवला गेल्या आठवड्यात टीएनसीए इलेव्हनसाठी खेळताना दुसऱ्या डावात बॅटिंग करता आली नव्हती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात फील्डिंगसाठीही आला नव्हता. त्यावेळेस मुंबई टीमच्या मॅनेजमेंटने त्याला अधिक गंभीर जखम न होण्यासाठी फिल्डिंग तसेच बॅटिंग करण्यास पाठवले नव्हते.



कसोटी संघात पुनरागमनाची आशा


सूर्यकुमार यादवने नुकतेच कसोटी संघात पुनरागमनाची आशा व्यक्त केली होती . गेल्या एका वर्षात तो एकही फर्स्ट क्लास सामना खेळलेला नाही आणि कसोटी संघात पुनरागमनाच्या इराद्यानेच त्याने बुची बाबू स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला होता.


भारतीय संघाला पुढील ५ महिन्यांत १० कसोटी सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने महत्त्वाचे आहेत कारण हे जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पक्के करू शकतो. सूर्याशिवाय दिलीप ट्रॉफीमधून मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांच्यात रूपाने दोन गोलंदाज आजारी असल्याने दिलीप ट्रॉफीमधून बाहेर झाले आहे.
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.