Mumbai News : प्रवाशांना दिलासा! तीन महिन्यांनंतर मांडवा – गेटवे जलवाहतूक पुन्हा सुरू

मुंबई : दरवर्षी जून ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान मुंबई-गेट वे ते मांडवा (Gateway To Mandwa) ही जलवाहतूक (Water Transport) सेवा बंद केली जाते. या महिन्यांच्या कालावधीत जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे जलवाहतूक कंपन्यांकडून हा निर्णय घेण्यात येतो. यंदाही जून आणि ऑगस्ट महिन्यात गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता पाऊस ओसरला असल्यामुळे कंपन्यांनीही सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिने ही सेवा बंद होती. मात्र आता सेवा सुरू झाल्यापासून गणेशोत्सवासाठी कोकणात विशेषतः अलिबाग मुरुड तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तीन महिने बंद असलेली मुंबई-गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज घेवून मेरीटाईम बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. तसेच हवामानाचा अंदाज घेऊन दिवसाला एक ते दोन फेऱ्या होणार आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.


दरम्यान, गणपती बाप्पाचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अलिबागहून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांना जलवाहतूक सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. प्रवाशांना अलिबाग ते मुंबई असा रस्तेमार्गे पार करायला जास्त वेळ लागत होता. तसेच रोरो सेवेचे तिकिटाचे दरही अधिक असल्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नव्हते. मात्र आता मांडवा- गेटवे सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Comments
Add Comment

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई