Dhangar reservation : धनगर समाजाचा पुन्हा एल्गार; ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष

बेमुदत उपोषणाची घोषणा


सोलापूर : धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी (Dhangar reservation) पुन्हा आंदोलन पुकारले आहे. ९ सप्टेंबरपासून पंढरपूर येथे राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी ही घोषणा केली आहे. "ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष" या घोषवाक्यासह आंदोलनाला सुरुवात होईल.


आंदोलनाची तयारी म्हणून १ सप्टेंबर रोजी जेजुरीत मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या दर्शनानंतर धनगर बांधव पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे उपोषण सुरू होईल. धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आहे.


सध्या, धनगर समाज ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गात आरक्षित आहे, परंतु त्यांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी त्यांची दीर्घकालीन मागणी आहे. यासाठी त्यांनी राज्यभरात आंदोलन केले आहे. कारंडे यांनी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांवर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर निष्क्रियता दाखवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता सर्व धनगर समाज एकत्र येऊन सामूहिक नेतृत्वाखाली हे उपोषण करणार आहे.


या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा आणि धनगर समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्याचा त्यांचा उद्देश आहे. उपोषण सुरू होण्यापूर्वी जेजुरीत भंडारा उधळून, खंडेरायाचे दर्शन घेतले जाईल. धनगर समाजाचे हे आंदोलन राज्यभरातील राजकारणात एक महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,