पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे सिडको ग्राउंड येथे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात गेले, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे नाव न घेता टीका केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नेहमी बोलले जाते. त्यांचा अपमान केला जातो. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करूनही माफी तर मागितली नाहीच. मात्र, ते न्यायालयामध्ये जातात. त्यांना कधीही याबाबत पश्चात्ताप झाला नाही किंवा होत नाही. कारण हे त्यांचे संस्कार आहेत, असा टोलाही पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी लगावला.
महाराष्ट्रातील जनता त्यांच्या संस्कारांना चांगले ओळखते. पण आमचे संस्कार वेगळे आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर नाव न घेता हल्लाबोल केला.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…