BSNLचा जबरदस्त प्लान, दररोजी २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यानंतर आता हजारो युजर्स बीएसएनएलच्या दिशेने आकर्षित होत आहे. अशातच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवनवे प्लान्स सादर केले आहेत. देशात बीएसएनएलने आपले नेटवर्क वेगाने वाढवण्याचे काम सुरू केले आहे.


मार्च २०२५ पर्यंत देशभरात बीएसएनएल ४जी सर्व्हिस सुरू होईल. अशातच आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या नव्या प्लानबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्हाला दररोज २ जीबी इंटरनेट डेटा सोबतच अनलिमिटेड कॉलिंगही मिळत आहे. सोबतच याची व्हॅलिडिटी ५ महिन्यांपर्यंत आहे.



बीएसएनला ४०० रूपयांपेक्षा कमीचा प्लान


बीएसएनएलच्या प्लानची किंमत ३९७ रूपये आहे. हा प्लान त्या लोकांसाठी शानदार मानला जात आहे ज्यांना सेकंडरी सिम म्हणून बीएसएनएलचे कार्ड वापरायचे आहे. या स्वस्त प्लानची व्हॅलिडिटी ५ महिन्यांची आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर १५० दिवसांपर्यंत रिचार्ज करावे लागणार नाही.



मिळतात हे फायदे


बीएसएनएलच्या ३९७ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला अनेक फायदे मिळतात. या प्लानमध्ये युजर्सला ३० दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ कोणत्याही नेटवर्कवर तुम्ही कॉल करू शकता. दरम्यान कंपनी युजर्सला १५० दिवसांपर्यंत फ्री इनकमिंग कॉल्सची सुविधा देते. म्हणजेच हा प्लान खरेदी केल्यानंतर तुम्हाला नंबर बंद होण्याचे टेन्शन नाही.


या प्लानमध्ये तुम्हाला पहिल्या ३० दिवसांपर्यंत दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळेल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा िळते. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 40Kbps चा स्पीड मिळेल. या प्लानमध्ये दररोज १० फ्री एसएमएस मिळतात.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या