मुंबईत पुन्हा हिट अँड रन, अल्पवयीन चालकाची बाईकस्वाराला धडक, एकाचा मृत्यू

  126

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुणेतील पोर्शे प्रकरणासारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथे अल्पवयीन चालकाने एका बाईकस्वाराला चिरडले. या अपघातात या २४ वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर अल्पवयीन आरोपी चालकाला पकडण्यात आले. अल्पवयीन मुलाव्यतिरिक्त आणखी दोन जणांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलाने तेथून पळून जाण्यचाा प्रयत्न केला होता.


हा अपघात मुंबईच्या गोरेगाव परिसरात घडला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी धरपकड केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी वेगवान महिंद्रा स्कॉर्पिओने २४ वर्षीय बाईकस्वाराला उडवले. जखमी तरूणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणात कार ताब्यात घेतली आहे.



अपघातानंतर खांबाला आदळली एसयूव्ही


पोलिसांच्या माहितीनुसार बाईकस्वाराला धडक मारल्यानंतर ही गाडी एका विजेच्या खांबाला जाऊन आदळली. यात अल्पवयीन चालकालाही जखमा झाल्या आहेत. यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले.


मृत २४ वर्षीय तरूणाचे नाव नवीन वैष्णव असे होते. तो गोरेगाव परिसरात दूध वाटत होता. हा अपघात सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आरे कॉलनीमध्ये घडला. आरोपी चालकाचे वय १७ वर्षे आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली