Ganeshotsav 2024 : गणेशमूर्ती दान करा, तीन किलो खत मिळवा

  91

पुणे : सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेला गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी महापालिकेने पुणेकरांना साद घातली आहे. गणेशोत्सवात जे भाविक महापालिकेकडे गणेशमूर्ती दान करतील, त्यांना प्रत्येकी तीन किलो सेंद्रीय खत दिले जाणार आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांवर ही सुविधा उपलब्ध असेल. तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी एक हजार या प्रमाणे १५ हजार नागरिकांना ही खताची पिशवी भेट दिली जाणार आहे.


शहरातील उरुळी देवाची येथील प्रक्रिया प्रकल्पातील हे खत असेल. “भूमीग्रीन एनर्जी’ या कंपनीकडून हे खत भेट दिले जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त संदीप कदम यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली.


या बैठकीत गणेशोत्सवातील स्वच्छता तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवात गर्दीमुळे कचरा वाढतो. हा कचरा उचलला न गेल्याने शहर अस्वच्छ होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या हद्दीत तीन पाळ्यांमध्ये परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत. नागरिकांकडून उघड्यावर कचरा फेकला जातो, अशा “क्रोनिक्स स्पॉट’वर लक्ष ठेवून कचरा फेकण्यावर प्रतिबंध करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या