Garlic Price Hike : गृहिणींचे बजेट कोलमडणार! लसणाची फोडणी देणे पडणार महागात

काय आहे प्रतिकिलो लसणाचा भाव?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना लागणाऱ्या गरजोपयोगी गोष्टींचे भाव (Price Hike) साततत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. अशातच गृहिणींच्या स्वयंपाक घरातील लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागल्याचे (Garlic Price Hike) चित्र दिसून येत आहे. लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत आहेत. त्यामुळे आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना वाढलेल्या लसणाच्या दरामुळे महागडा लसूण विकत घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न पडत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून लसणाच्या लागवडीत घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला लसूण विक्रीसाठी बाहेर काढला होता. त्यामुळे यंदा लसणाची साठवणूक कमी आणि ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारात सध्या लसूणचा भाव ४०० रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. तर हाच लसूण घाऊक बाजारात २०० ते ३२० रुपये प्रतिकिलो रुपयांवर विकला जात आहे. पुढील काही महिन्यांत हा भाव आणखी वाढून तब्बल ६०० रुपयांपर्यंत पोहचू शकतो अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.



लसणाचे दर कमी केव्हा होणार?


लसूण महागल्यावर आता पुन्हा दर किती दिवसांपर्यंत कमी होतील असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत याहे. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये नवीन लसूणचे उत्पादन होते. त्यानंतर आवक फेब्रुवारीपर्यंत सुरळीत होते. त्यामुळे या वर्षी तरी नागरिकांना महागडाच लसूण खावा लागणार असल्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात