आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही ही कामे करू नयेत

मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात मोठे अर्थशास्त्र आणि विद्वान मानले जात अससे. त्यांनी आपल्या नीति शास्त्रात जीवनात यशस्वी होण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.


चाणक्यने आपल्या नीति शास्त्रात तीन अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जे आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही करू नयेत.


आचार्य चाणक्य यांच्या मते पालकांनी आपल्या मुलांसमोर विचारपूर्वक बोलले पाहिजे. मुलांसमोर तुमची भाषा आणि बोली तसेच वागणूकही व्यवस्थित असली पाहिजे.


अहंकार, द्वेष, क्रोध, अपमान अथवा शिवीगाळ मुलांसमोर चुकूनही करू नये. यामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. तसेच ते चांगला माणूस बनणार नाहीत.


आईवडिलांनी मुलांसमोर कधीही एकमेकांचा अपमान करू नये. यामुळे मुलांचे पालनपोषण, संस्कार आणि व्यवहार यांच्यावर वाईट परिणाम होतो.


आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही खोटे बोलू नये. असे केल्याने आई-वडिल मुलांच्या नजरेत आपला सन्मान गमावतात.


जर मुले खोटे बोलत असतील तर त्याला चांगले संस्कार देणे कठीण होते.


आई-वडिलांनी मुलांसमोर कधीही चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नये. त्यांना सुरूवातीपासूनच योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावला पाहिजे.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल