WTC: बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची वाईट स्थिती

मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना पाकिस्तानला रावळपिंडी कसोटी सामन्यात १० विकेटनी हरवले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय आहे. सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला ३० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी विकेट न गमावता पूर्ण केले. तसेच सामना आपल्या नावे केला. पहिल्यांदा पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात १० विकेटनी पराभव सहन करावा लागला.



पराभवानंतर पाकिस्तानला झटका


बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानचा संघ आता आठव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ६ सामन्यात दोन विजय आणि चार पराभवासह २२ गुण मिळवले आहेत. तर बांगलादेशचा संघ शानदार विजयासह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशने ५ सामन्यात २४ गुण मिळवले आहेत.


WTC गुणालिकेत सध्या भारतीय संघ ६८.५२ टक्के अंकांसह अव्वल स्थाावर आहे. भारताने आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ६ विजय आणि दोन पराभव तसेच एक अनिर्णीत असे ७४ गुण मिळवले आहेत. कांगारूच्या संघाने १२ सामन्यात ८ विजय, तीन पराभव आणि एक अनिर्णीतसह ९० अंक मिळवले आहेत. त्यांची टक्केवारी ६२.५० इतकी आहे.

Comments
Add Comment

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९