मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना पाकिस्तानला रावळपिंडी कसोटी सामन्यात १० विकेटनी हरवले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय आहे. सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला ३० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी विकेट न गमावता पूर्ण केले. तसेच सामना आपल्या नावे केला. पहिल्यांदा पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात १० विकेटनी पराभव सहन करावा लागला.
बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानचा संघ आता आठव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ६ सामन्यात दोन विजय आणि चार पराभवासह २२ गुण मिळवले आहेत. तर बांगलादेशचा संघ शानदार विजयासह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशने ५ सामन्यात २४ गुण मिळवले आहेत.
WTC गुणालिकेत सध्या भारतीय संघ ६८.५२ टक्के अंकांसह अव्वल स्थाावर आहे. भारताने आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ६ विजय आणि दोन पराभव तसेच एक अनिर्णीत असे ७४ गुण मिळवले आहेत. कांगारूच्या संघाने १२ सामन्यात ८ विजय, तीन पराभव आणि एक अनिर्णीतसह ९० अंक मिळवले आहेत. त्यांची टक्केवारी ६२.५० इतकी आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…