WTC: बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची वाईट स्थिती

मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना पाकिस्तानला रावळपिंडी कसोटी सामन्यात १० विकेटनी हरवले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय आहे. सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला ३० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी विकेट न गमावता पूर्ण केले. तसेच सामना आपल्या नावे केला. पहिल्यांदा पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात १० विकेटनी पराभव सहन करावा लागला.



पराभवानंतर पाकिस्तानला झटका


बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानचा संघ आता आठव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ६ सामन्यात दोन विजय आणि चार पराभवासह २२ गुण मिळवले आहेत. तर बांगलादेशचा संघ शानदार विजयासह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशने ५ सामन्यात २४ गुण मिळवले आहेत.


WTC गुणालिकेत सध्या भारतीय संघ ६८.५२ टक्के अंकांसह अव्वल स्थाावर आहे. भारताने आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ६ विजय आणि दोन पराभव तसेच एक अनिर्णीत असे ७४ गुण मिळवले आहेत. कांगारूच्या संघाने १२ सामन्यात ८ विजय, तीन पराभव आणि एक अनिर्णीतसह ९० अंक मिळवले आहेत. त्यांची टक्केवारी ६२.५० इतकी आहे.

Comments
Add Comment

२३ धावा करूनही स्मृती मंधानाने रचला इतिहास, २८ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

विशाखापट्टणम: भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आपला तिसरा सामना द. आफ्रिकेविरुद्ध खेळत

IND vs SA: रिचा घोषची जबरदस्त खेळी, द. आफ्रिकेसमोर २५२ धावांचे आव्हान

विशाखापट्टणम: भारताची क्रिकेटपटू रिचा घोषच्या ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने द. आफ्रिकेसमोर

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब