Dahihandi festival : मनसेचा डोंबिवली पूर्वेतील दहीहंडी उत्सव रद्द!

आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी दिली माहिती


डोंबिवली : बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मनसेने यावर्षी डोंबिवली पूर्वेतील चार रस्तावरील दहीहंडी उत्सव (Dahihandi festival) रद्द करत आहोत अशी घोषणा कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केली. परिणामी यावर्षी चार रस्ता येथे मनसेची दहीहंडी उभारण्यात येणार नाही.


याबाबत आमदार पाटील म्हणतात, बदलापूरातील या पीडित दोन कुटुंबांच्या घरात घडलेल्या या प्रकारामुळे ही कुटुंबे दुखी आहेत. यासाठी आपल्या पाठीशी संपूर्ण समाज आहे हे दाखविणे आवश्यक आहे. या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मनसे त्यांना साथ देणार असेही पाटील सांगतात.


वर्षोनुवर्षे डोंबिवलीत आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतच असतो पण यावर्षी बदलापूर येथील अशा निंदनीय घटनेचे सावट या उत्सवावर आहे म्हणून बदलापूर, डोंबिवली शहरात मनसेने आयोजित केलेला दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.


बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेबाबत शाळेतील आरोपी नराधमावर गुन्हा दाखल करून घेण्यात मनसेच्या बदलापूरातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत घटनेला वाचा फोडली. अशा घटना होवू नयेत यासाठी मनसेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापनांना मुलींच्या सुरक्षिततेबाबत घ्यावयाची काळजी, तसेच याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यांनी प्रत्येक शाळेला एक छापील पत्रक देऊन मनसे पदाधिकारी त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी शाळा व्यवस्थापनाने करावी म्हणून प्रयत्न करत आहेत.


दरवर्षी पूर्वेकडील चार रस्ता येथील पाटणकर चौकात मनसेच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी या भागातील वाहतुकीत वाहतूक विभागाने बदल केला होता. पण आता दहीहंडी रद्द झाल्याने येथील वाहतूक नेहमीप्रमाणेच राहील असे दिसत आहे.

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे