Modi Express : यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार 'मोदी एक्सप्रेस'; चाकरमान्यांचा होणार मोफत प्रवास!

  445

जाणून घ्या काय आहे वेळ, तारीख आणि तिकीट बुकींग प्रक्रिया


मुंबई : मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा (BJP) पक्षाकडून कोकणात 'मोदी एक्सप्रेस' (Modi Express) सोडण्यात येणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही गणेशभक्तांसाठी अभिनव प्रवास योजना सुरु केली आहे. १२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास सुरुवातीला बसमार्फत सुरु केला होता, कालांतराने हा रेल्वेप्रवास सुरु केला. दरवर्षीप्रमाणे नागरिकांनी यंदाही या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन नितेश राणे यांनी केले.


त्याचबरोबर, मोदी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. त्याचा प्रवास पूर्णपणे मोफत असेल. या गाडीचा संपूर्ण खर्च भाजपाकडून केला जाणार आहे. ही सुविधा फक्त एका दिवसासाठी असून प्रवासादरम्यान गणेशभक्तांना जेवण व पाण्याची सोय देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे.



मोदी एक्स्प्रेस कधी सुटणार?


ही गाडी ४ सप्टेंबर रोजी दादर स्थानकावरील ८नंबर प्लॅटफॉर्मवरुन सकाळी १० वाजता रवाना होणार आहे. या एक्सप्रेसच्या तिकीट बुकींगसाठी प्रवाशांना देवगड, कणकवली, वैभववाडी येथील भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना संपर्क करावा लागणार आहे. तसेच २८, २९ आणि ३० ऑगस्ट हे तीन दिवस तिकीट बुकींग करु शकणार आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या