Modi Express : यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार 'मोदी एक्सप्रेस'; चाकरमान्यांचा होणार मोफत प्रवास!

  434

जाणून घ्या काय आहे वेळ, तारीख आणि तिकीट बुकींग प्रक्रिया


मुंबई : मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा (BJP) पक्षाकडून कोकणात 'मोदी एक्सप्रेस' (Modi Express) सोडण्यात येणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही गणेशभक्तांसाठी अभिनव प्रवास योजना सुरु केली आहे. १२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास सुरुवातीला बसमार्फत सुरु केला होता, कालांतराने हा रेल्वेप्रवास सुरु केला. दरवर्षीप्रमाणे नागरिकांनी यंदाही या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन नितेश राणे यांनी केले.


त्याचबरोबर, मोदी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. त्याचा प्रवास पूर्णपणे मोफत असेल. या गाडीचा संपूर्ण खर्च भाजपाकडून केला जाणार आहे. ही सुविधा फक्त एका दिवसासाठी असून प्रवासादरम्यान गणेशभक्तांना जेवण व पाण्याची सोय देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे.



मोदी एक्स्प्रेस कधी सुटणार?


ही गाडी ४ सप्टेंबर रोजी दादर स्थानकावरील ८नंबर प्लॅटफॉर्मवरुन सकाळी १० वाजता रवाना होणार आहे. या एक्सप्रेसच्या तिकीट बुकींगसाठी प्रवाशांना देवगड, कणकवली, वैभववाडी येथील भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना संपर्क करावा लागणार आहे. तसेच २८, २९ आणि ३० ऑगस्ट हे तीन दिवस तिकीट बुकींग करु शकणार आहेत.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या