Coriander Water Benefits: दररोज एक ग्लास प्या धण्याचं पाणी शरीराला मिळतील ‘हे’ भन्नाट ५ फायदे

  149

आपल्या घरी किचनमध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. मात्र त्यांबाबत अनेकांना माहीत नसतं. अशीच एक गोष्ट म्हणजे धणे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये धण्याचा चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. पण याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात. धण्यामध्ये भरपूर मिनरल्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स, फायबर आणि अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्ही धणे पाण्यात भिजवून हे पाणी प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्यापासून इतरही अनेक फायदे मिळतील. चला तर जाणून घेऊया धण्याचं पाणी पिण्याचे फायदे...

 

शरीरातील सूज कमी होते


धण्याच्या बियांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात ज्यामध्ये फ्लावोलॉयड्स, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. यासाठी धण्याचं पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील सूजही कमी होते.

पचनक्रिया चांगली राहते


पहाटे रोज उठून तुम्ही धण्याचं पाणी प्याल तर पचन तंत्र चांगलं राहण्यात मदत होते. धण्याच्या बियांमध्ये अ‍ॅक्टिव एंझाइम्स असतात जे पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. धण्याच्या पाण्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या होतात जसं की, अ‍ॅसिडिटी, पोटदुखीही, आणि गॅस दूर होते.


वजन नियंत्रणात राहतं


धन्याच्या पाण्याचं सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहतं. यात फायबर जास्त प्रमाणात असतं. ज्याने वजन कमी करण्यास मदत होते. आणि अन्न पचनास होण्यास मदत होते, व पोट जास्त वेळ भरून राहतं.

हृदयासाठी फायदेशीर


धण्यामध्ये फायबर आणि पोटॅशिअम जास्त प्रमाणात असल्यामुळे हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पाणी प्यायल्याने स्ट्रोक, हार्ट अटॅक, सारख्या समस्यांचा धोका उद्भवत नाही.

विषारी पदार्थ बाहेर टाकतील


किडनी साफ होण्यास धण्यांच्या पाण्याची मदत होते, लघवीसंबंधी समस्या दूर होतात. तसंच शरीरातले विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते.

 

 

 
Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे