Coriander Water Benefits: दररोज एक ग्लास प्या धण्याचं पाणी शरीराला मिळतील ‘हे’ भन्नाट ५ फायदे

  161

आपल्या घरी किचनमध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. मात्र त्यांबाबत अनेकांना माहीत नसतं. अशीच एक गोष्ट म्हणजे धणे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये धण्याचा चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. पण याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात. धण्यामध्ये भरपूर मिनरल्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स, फायबर आणि अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्ही धणे पाण्यात भिजवून हे पाणी प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्यापासून इतरही अनेक फायदे मिळतील. चला तर जाणून घेऊया धण्याचं पाणी पिण्याचे फायदे...

 

शरीरातील सूज कमी होते


धण्याच्या बियांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात ज्यामध्ये फ्लावोलॉयड्स, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. यासाठी धण्याचं पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील सूजही कमी होते.

पचनक्रिया चांगली राहते


पहाटे रोज उठून तुम्ही धण्याचं पाणी प्याल तर पचन तंत्र चांगलं राहण्यात मदत होते. धण्याच्या बियांमध्ये अ‍ॅक्टिव एंझाइम्स असतात जे पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. धण्याच्या पाण्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या होतात जसं की, अ‍ॅसिडिटी, पोटदुखीही, आणि गॅस दूर होते.


वजन नियंत्रणात राहतं


धन्याच्या पाण्याचं सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहतं. यात फायबर जास्त प्रमाणात असतं. ज्याने वजन कमी करण्यास मदत होते. आणि अन्न पचनास होण्यास मदत होते, व पोट जास्त वेळ भरून राहतं.

हृदयासाठी फायदेशीर


धण्यामध्ये फायबर आणि पोटॅशिअम जास्त प्रमाणात असल्यामुळे हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पाणी प्यायल्याने स्ट्रोक, हार्ट अटॅक, सारख्या समस्यांचा धोका उद्भवत नाही.

विषारी पदार्थ बाहेर टाकतील


किडनी साफ होण्यास धण्यांच्या पाण्याची मदत होते, लघवीसंबंधी समस्या दूर होतात. तसंच शरीरातले विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते.

 

 

 
Comments
Add Comment

श्रावण महिन्यास उरलेत काही दिवस, पाहा कधीपासून सुरू होणार व्रत-वैकल्ये

मुंबई: आषाढी एकादशी आटोपली की, भाविकांना सण, उत्सवांचा महिना श्रावणाची चाहुल लागते. यंदा गुरुवार, २४ जुलैला आषाढ

हे तांदूळ खा , फिटनेस जपा !

मुंबई : आपल्या देशात अनेक प्रकारचा तांदुळ पिकवतात . भारतीय आहारात भाताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, आधुनिक

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि