Assembly Election 2024 : विधानसभेच्या विजयासाठी भाजपाची रणनीती! वापरणार 'हा' नवा फॉर्म्युला

  70

मुंबई : सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष जय्यद तयारी करत आहेत. अशातच महायुतीकडूनही (Mahayuti) भाजपाचेच (BJP) सरकार पुन्हा निवडून येण्यासाठी नवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपा वारंवार बैठकी घेत आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूर शहरात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर उद्या देखील मुंबईत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कोणत्या रणनीतीचा वापर करणार आहे, याबाबत चर्चेचे उधाण आले होते. परंतु आता चर्चेला पूर्णविराम मिळाला असून भाजपाच्या रणनीतीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा जिंकण्यासाठी भाजपा पक्ष विधानसभा मतदारसंघ असा फोकस न करता पंचायत समिती सर्कल फोकस करून प्रचारयंत्रणा, संपर्कयंत्रणा राबविणार आहे. तसेच पक्षातील गटबाजी करणाऱ्या नेत्यांना महत्त्व दिले जाणार नसून अनुभवी व्यक्तींना अधिक जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नेत्यांपेक्षा कार्यकर्ता हा बेस असून अन्य राज्यातील मोठ्या नेत्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



काय आहे फॉर्म्युला?


१५-३००-१५०- ४५००




  • आतापर्यंत निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने बूथप्रमुख हा महत्त्वाचा घटक असायचा. बूथप्रमुखांची रचना कायम ठेवली जाणार असली तरी त्याला समांतर एक वेगळी रचना आता करण्यात आली आहे.

  • राजकीय समज एकदम पक्की असलेल्या १५ जणांची एक टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार केली जात आहे.

  • त्यात निवडणुका जिंकण्याचा, लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार प्रमुख कार्यकर्ते, नेते असतील. हे टूलकिट क्रमांक एक असेल. या १५ जणांपैकी प्रत्येक जण ३०० जणांची टीम तयार करेल, हे टूलकिट क्रमांक २ असेल.

  • हे ३०० जण मग प्रत्येकी १५० या प्रमाणे ४५ हजार जणांच्या टीम तयार करतील. हे सगळे जण एका ॲपवर जोडले जातील आणि ते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतील.

  • बूथप्रमुख पक्षासाठी कष्ट खूप करतो. पण लोकांना प्रभावित करणे, त्यांना पक्षाकडे खेचून आणण्याबाबत तो कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर आता ही वेगळी रचना करण्याचे ठरले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी १५०० महिलांच्या उपस्थितीत १५ मेळावे घेण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या