Assembly Election 2024 : विधानसभेच्या विजयासाठी भाजपाची रणनीती! वापरणार 'हा' नवा फॉर्म्युला

  79

मुंबई : सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष जय्यद तयारी करत आहेत. अशातच महायुतीकडूनही (Mahayuti) भाजपाचेच (BJP) सरकार पुन्हा निवडून येण्यासाठी नवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपा वारंवार बैठकी घेत आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूर शहरात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर उद्या देखील मुंबईत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कोणत्या रणनीतीचा वापर करणार आहे, याबाबत चर्चेचे उधाण आले होते. परंतु आता चर्चेला पूर्णविराम मिळाला असून भाजपाच्या रणनीतीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा जिंकण्यासाठी भाजपा पक्ष विधानसभा मतदारसंघ असा फोकस न करता पंचायत समिती सर्कल फोकस करून प्रचारयंत्रणा, संपर्कयंत्रणा राबविणार आहे. तसेच पक्षातील गटबाजी करणाऱ्या नेत्यांना महत्त्व दिले जाणार नसून अनुभवी व्यक्तींना अधिक जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नेत्यांपेक्षा कार्यकर्ता हा बेस असून अन्य राज्यातील मोठ्या नेत्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



काय आहे फॉर्म्युला?


१५-३००-१५०- ४५००




  • आतापर्यंत निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने बूथप्रमुख हा महत्त्वाचा घटक असायचा. बूथप्रमुखांची रचना कायम ठेवली जाणार असली तरी त्याला समांतर एक वेगळी रचना आता करण्यात आली आहे.

  • राजकीय समज एकदम पक्की असलेल्या १५ जणांची एक टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार केली जात आहे.

  • त्यात निवडणुका जिंकण्याचा, लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार प्रमुख कार्यकर्ते, नेते असतील. हे टूलकिट क्रमांक एक असेल. या १५ जणांपैकी प्रत्येक जण ३०० जणांची टीम तयार करेल, हे टूलकिट क्रमांक २ असेल.

  • हे ३०० जण मग प्रत्येकी १५० या प्रमाणे ४५ हजार जणांच्या टीम तयार करतील. हे सगळे जण एका ॲपवर जोडले जातील आणि ते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतील.

  • बूथप्रमुख पक्षासाठी कष्ट खूप करतो. पण लोकांना प्रभावित करणे, त्यांना पक्षाकडे खेचून आणण्याबाबत तो कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर आता ही वेगळी रचना करण्याचे ठरले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी १५०० महिलांच्या उपस्थितीत १५ मेळावे घेण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक