मुंबई : सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष जय्यद तयारी करत आहेत. अशातच महायुतीकडूनही (Mahayuti) भाजपाचेच (BJP) सरकार पुन्हा निवडून येण्यासाठी नवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपा वारंवार बैठकी घेत आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूर शहरात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर उद्या देखील मुंबईत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कोणत्या रणनीतीचा वापर करणार आहे, याबाबत चर्चेचे उधाण आले होते. परंतु आता चर्चेला पूर्णविराम मिळाला असून भाजपाच्या रणनीतीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा जिंकण्यासाठी भाजपा पक्ष विधानसभा मतदारसंघ असा फोकस न करता पंचायत समिती सर्कल फोकस करून प्रचारयंत्रणा, संपर्कयंत्रणा राबविणार आहे. तसेच पक्षातील गटबाजी करणाऱ्या नेत्यांना महत्त्व दिले जाणार नसून अनुभवी व्यक्तींना अधिक जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नेत्यांपेक्षा कार्यकर्ता हा बेस असून अन्य राज्यातील मोठ्या नेत्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१५-३००-१५०- ४५००
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…