पोलिसांच्या बदलीच्या पैशांवरच मातोश्री २ उभारली!

  111

भ्रष्टाचाराच्या बाता मारणा-या संजय राऊतांना आमदार नितेश राणे यांचे चोख प्रत्युत्तर


मुंबई : राज्यातील पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आमदार नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून किंवा बीकेसीमधील एका रेस्टॉरंटमध्ये बसून मविआचे गृहमंत्री पोलिसांच्या बदलीचे सौदेबाजी आणि वसुली करायचे. तसेच मविआच्या काळात पोलिसांना हे लोक अक्षरक्ष: घरघडीसारखे वागवायचे. या लोकांनी पोलिसांच्या बदलीच्या पैशांवरच मातोश्री २ उभी केली आहे, त्यामुळे संजय राजाराम राऊत या बदल्यांसंदर्भात थोबाड उघडू नये, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.



नरेंद्र मोदी विश्वगुरु तर उद्धव ठाकरेला कुत्रंही विचारत नाही


संजय राजाराम राऊतचा मालक केवळ फोटोशूटसाठी आंतरराष्ट्रीय देशात जातो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही देशात पाय ठेवतात तिकडे त्यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो भारतीयांची गर्दी जमते. पण त्याच जागी उद्धव ठाकरे गेले तर त्याला कुठला कुत्रंही विचारत नाही. म्हणून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरु आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले.


Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना