पोलिसांच्या बदलीच्या पैशांवरच मातोश्री २ उभारली!

भ्रष्टाचाराच्या बाता मारणा-या संजय राऊतांना आमदार नितेश राणे यांचे चोख प्रत्युत्तर


मुंबई : राज्यातील पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आमदार नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून किंवा बीकेसीमधील एका रेस्टॉरंटमध्ये बसून मविआचे गृहमंत्री पोलिसांच्या बदलीचे सौदेबाजी आणि वसुली करायचे. तसेच मविआच्या काळात पोलिसांना हे लोक अक्षरक्ष: घरघडीसारखे वागवायचे. या लोकांनी पोलिसांच्या बदलीच्या पैशांवरच मातोश्री २ उभी केली आहे, त्यामुळे संजय राजाराम राऊत या बदल्यांसंदर्भात थोबाड उघडू नये, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.



नरेंद्र मोदी विश्वगुरु तर उद्धव ठाकरेला कुत्रंही विचारत नाही


संजय राजाराम राऊतचा मालक केवळ फोटोशूटसाठी आंतरराष्ट्रीय देशात जातो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही देशात पाय ठेवतात तिकडे त्यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो भारतीयांची गर्दी जमते. पण त्याच जागी उद्धव ठाकरे गेले तर त्याला कुठला कुत्रंही विचारत नाही. म्हणून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरु आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले.


Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.