मुंबई : राज्यातील पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आमदार नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून किंवा बीकेसीमधील एका रेस्टॉरंटमध्ये बसून मविआचे गृहमंत्री पोलिसांच्या बदलीचे सौदेबाजी आणि वसुली करायचे. तसेच मविआच्या काळात पोलिसांना हे लोक अक्षरक्ष: घरघडीसारखे वागवायचे. या लोकांनी पोलिसांच्या बदलीच्या पैशांवरच मातोश्री २ उभी केली आहे, त्यामुळे संजय राजाराम राऊत या बदल्यांसंदर्भात थोबाड उघडू नये, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.
संजय राजाराम राऊतचा मालक केवळ फोटोशूटसाठी आंतरराष्ट्रीय देशात जातो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही देशात पाय ठेवतात तिकडे त्यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो भारतीयांची गर्दी जमते. पण त्याच जागी उद्धव ठाकरे गेले तर त्याला कुठला कुत्रंही विचारत नाही. म्हणून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरु आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…