Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू

मुंबई: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथील फार्मा कंपनीत बुधवारी जोरदार स्फोट झाला. यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कमीत कमी ४१ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर लगेचच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिडिया रिपोर्ट्सनुसार अच्युतरपुरम एसईजेड स्थित एका कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. डॉक्टरांच्या टीम जखमींवर उपचार करत आहेत. जखमींचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले आहेत. अशात सांगितले गेले की या सर्व घटनेनंतर या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण आहे.



दुपारच्या जेवणाच्या वेळेस घडली दुर्घटना नाहीतर...


कंपनीत ही दुर्घटना दुपारच्या वेळेस घडली नाहीतर खूप मोठी जिवितहानी झाली असते. कारण दुपारच्या वेळेस जेवणासाठी अनेक कामगार बाहेर गेले होते. त्यावेळेस रिअ‍ॅक्टरजवळ कमी कर्मचारी होते.


 


पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा


पंतप्रधानकार्यालयाकडून एक्स पोस्टमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, अनकापल्लीमध्ये झालेल्या फॅक्टरीमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी दु:खी आहे. आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्यांप्रती संवेदना. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव