Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू

  86

मुंबई: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथील फार्मा कंपनीत बुधवारी जोरदार स्फोट झाला. यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कमीत कमी ४१ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर लगेचच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिडिया रिपोर्ट्सनुसार अच्युतरपुरम एसईजेड स्थित एका कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. डॉक्टरांच्या टीम जखमींवर उपचार करत आहेत. जखमींचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले आहेत. अशात सांगितले गेले की या सर्व घटनेनंतर या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण आहे.



दुपारच्या जेवणाच्या वेळेस घडली दुर्घटना नाहीतर...


कंपनीत ही दुर्घटना दुपारच्या वेळेस घडली नाहीतर खूप मोठी जिवितहानी झाली असते. कारण दुपारच्या वेळेस जेवणासाठी अनेक कामगार बाहेर गेले होते. त्यावेळेस रिअ‍ॅक्टरजवळ कमी कर्मचारी होते.


 


पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा


पंतप्रधानकार्यालयाकडून एक्स पोस्टमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, अनकापल्लीमध्ये झालेल्या फॅक्टरीमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी दु:खी आहे. आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्यांप्रती संवेदना. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा