Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू

मुंबई: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथील फार्मा कंपनीत बुधवारी जोरदार स्फोट झाला. यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कमीत कमी ४१ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर लगेचच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिडिया रिपोर्ट्सनुसार अच्युतरपुरम एसईजेड स्थित एका कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. डॉक्टरांच्या टीम जखमींवर उपचार करत आहेत. जखमींचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले आहेत. अशात सांगितले गेले की या सर्व घटनेनंतर या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण आहे.



दुपारच्या जेवणाच्या वेळेस घडली दुर्घटना नाहीतर...


कंपनीत ही दुर्घटना दुपारच्या वेळेस घडली नाहीतर खूप मोठी जिवितहानी झाली असते. कारण दुपारच्या वेळेस जेवणासाठी अनेक कामगार बाहेर गेले होते. त्यावेळेस रिअ‍ॅक्टरजवळ कमी कर्मचारी होते.


 


पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा


पंतप्रधानकार्यालयाकडून एक्स पोस्टमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, अनकापल्लीमध्ये झालेल्या फॅक्टरीमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी दु:खी आहे. आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्यांप्रती संवेदना. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या