Badlapur Crime : विरोधकांची संवेदना बोथट झाली; राजकीय पोळी भाजत राजकारण करणाऱ्यांवर फडणवीस भडकले

उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचे सुरू आहे गलिच्छ राजकारण


मुंबई : बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. परंतु राज्यातल्या विरोधकांची संवेदना बोथट झाली असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदलापूर अत्याचार (Badlapur Crime) घटनेप्रकरणी राजकारण करणाऱ्या विरोधकांवर केली आहे.


बदलापूर घटना प्रकरणाची (Badlapur Crime) केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचा शब्द याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळा कर्मचाऱ्यानेच हा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याविरोधात बदलापूरमध्ये नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदलापूरमधील घटना निंदनीय असून शाळा कर्मचाऱ्याचे कृत्य निंदनीय आहे. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, असाच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. घटना उघडकीस आल्यानंतर जी जी कारवाई केली पाहिजे. जी कारवाई झाली पाहिजे, तशीच कारवाई सुरु आहे. या केसच्या तपासासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. परंतु, विरोधकांच्या मनात केवळ राजकारण असून संवेदना बोथट झालेल विरोधक आहेत, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.





विरोधी नेते अशा घटनांमध्ये राजकीय पोळी भाजतात. विरोधकांच्या मनात केवळ राजकारण आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी असे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे हे त्यांना शोभत नाही. ज्यावेळी अशा संवदेनशील घटना घडतात तेव्हा राजकीय न वागता जनतेला काय दिलासा देता येईल, न्याय कसा देता येईल असे वागले पाहिजे. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचे असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.


बदलापूरची घटना १३ ऑगस्टला घडली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ कारवाई सुरु झाली. या प्रकरणी कोणी दिरंगाई केली आहे का? त्याचा तपास केला जाईल. दिरंगाई करणाऱ्यांविरोधात अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असून चौकशी जलदगतीने होणार आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

महापालिकेच्या प्रत्येक तक्रारींचे आता त्वरीत निवारण...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची तक्रार केल्यानंतर त्याला प्रतिसाद

मराठा आरक्षणाचा पेच उच्च न्यायालयात! ओबीसी कोट्यातील अध्यादेशावर आता कोर्टाची नजर

मुंबई: मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातून आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई  खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी