Badlapur Crime : विरोधकांची संवेदना बोथट झाली; राजकीय पोळी भाजत राजकारण करणाऱ्यांवर फडणवीस भडकले

  171

उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचे सुरू आहे गलिच्छ राजकारण


मुंबई : बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. परंतु राज्यातल्या विरोधकांची संवेदना बोथट झाली असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदलापूर अत्याचार (Badlapur Crime) घटनेप्रकरणी राजकारण करणाऱ्या विरोधकांवर केली आहे.


बदलापूर घटना प्रकरणाची (Badlapur Crime) केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचा शब्द याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळा कर्मचाऱ्यानेच हा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याविरोधात बदलापूरमध्ये नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदलापूरमधील घटना निंदनीय असून शाळा कर्मचाऱ्याचे कृत्य निंदनीय आहे. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, असाच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. घटना उघडकीस आल्यानंतर जी जी कारवाई केली पाहिजे. जी कारवाई झाली पाहिजे, तशीच कारवाई सुरु आहे. या केसच्या तपासासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. परंतु, विरोधकांच्या मनात केवळ राजकारण असून संवेदना बोथट झालेल विरोधक आहेत, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.





विरोधी नेते अशा घटनांमध्ये राजकीय पोळी भाजतात. विरोधकांच्या मनात केवळ राजकारण आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी असे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे हे त्यांना शोभत नाही. ज्यावेळी अशा संवदेनशील घटना घडतात तेव्हा राजकीय न वागता जनतेला काय दिलासा देता येईल, न्याय कसा देता येईल असे वागले पाहिजे. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचे असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.


बदलापूरची घटना १३ ऑगस्टला घडली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ कारवाई सुरु झाली. या प्रकरणी कोणी दिरंगाई केली आहे का? त्याचा तपास केला जाईल. दिरंगाई करणाऱ्यांविरोधात अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असून चौकशी जलदगतीने होणार आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी