BSNLच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, १०५ दिवसांची व्हॅलिडिटी

  1158

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या रिचार्ज प्लान्सनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. खाजगी कंपन्यांच्या प्लान्सच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर बीएसएनएल सातत्याने चर्चेत आहे. अशातच बीएलएनएलने आपले अनेक शानदार रिचार्ज प्लान्स सादर केले आहेत. यातच एक रिचार्ज प्लान जो ग्राहकांना दररोजी २ जीबी हाय स्पीड इंटरनेट डेटा देतो.



BSNL चा स्वस्त प्लान


आम्ही BSNL च्या ज्या प्लान्सबद्दल बोलत आहोत त्याची किंमत ६६६ रूपये आहे. तर या प्लानची व्हॅलिडिटी १०५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय युजर्सला या प्लानमध्ये १०० एसएमएस दररोज मिळतात.



हाय स्पीड इंटरनेट डेटा


BSNL च्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण २१० जीबी हाय स्पीड ४जी डेटा मिळतो. या प्लानमध्ये दिवसाला २ जीबी पर्यंत इंटरनेट डेटाचा वापर करता येतो. दररोजचा २ जीबी संपल्यानंतर युजर्सला ४० केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट मिळते. हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना दीर्घकाळ व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड इंटरनेट डेटाचा लाभ घ्यायचा आहे.



लवकर लाँच होणार ४जी सर्व्हिस


मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०२५ पर्यंत बीएसएनएल संपूर्ण देशभरात आपली ४जी सर्व्हिस रोलआऊट करणार आहे. तर २०२५च्या अखेरपर्यंत ५ जी सर्व्हिसली लाँच केली जाऊ शकते. बीएसएनएल सध्या देशभरात आपले जाळे विस्तारत आहे. त्यामुळे त्यांनी सर्व्हिस सुधारण्यावरही भर दिला आहे.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना