BSNLच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, १०५ दिवसांची व्हॅलिडिटी

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या रिचार्ज प्लान्सनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. खाजगी कंपन्यांच्या प्लान्सच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर बीएसएनएल सातत्याने चर्चेत आहे. अशातच बीएलएनएलने आपले अनेक शानदार रिचार्ज प्लान्स सादर केले आहेत. यातच एक रिचार्ज प्लान जो ग्राहकांना दररोजी २ जीबी हाय स्पीड इंटरनेट डेटा देतो.



BSNL चा स्वस्त प्लान


आम्ही BSNL च्या ज्या प्लान्सबद्दल बोलत आहोत त्याची किंमत ६६६ रूपये आहे. तर या प्लानची व्हॅलिडिटी १०५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय युजर्सला या प्लानमध्ये १०० एसएमएस दररोज मिळतात.



हाय स्पीड इंटरनेट डेटा


BSNL च्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण २१० जीबी हाय स्पीड ४जी डेटा मिळतो. या प्लानमध्ये दिवसाला २ जीबी पर्यंत इंटरनेट डेटाचा वापर करता येतो. दररोजचा २ जीबी संपल्यानंतर युजर्सला ४० केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट मिळते. हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना दीर्घकाळ व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड इंटरनेट डेटाचा लाभ घ्यायचा आहे.



लवकर लाँच होणार ४जी सर्व्हिस


मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०२५ पर्यंत बीएसएनएल संपूर्ण देशभरात आपली ४जी सर्व्हिस रोलआऊट करणार आहे. तर २०२५च्या अखेरपर्यंत ५ जी सर्व्हिसली लाँच केली जाऊ शकते. बीएसएनएल सध्या देशभरात आपले जाळे विस्तारत आहे. त्यामुळे त्यांनी सर्व्हिस सुधारण्यावरही भर दिला आहे.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,