Satara News : सातारकरांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल; प्रवास होणार आणखी आरामदायी!

सातारा : साताराकरांसाठी (Satara) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या ई-बस (Electric Bus) सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. त्यापासून कित्येक दिवस ई-बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांची आता प्रतिक्षा संपली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ई बसेस गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे साताराकरांचा आता वातानुकूलित (Air Conditioning) बसमधून आरामदायी प्रवास होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच एसटी महामंडळाच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई-बस सेवा सुरु केली आहे. साताऱ्यातील एसटी स्टँड मध्ये पहिल्या टप्प्यात पाच गाड्या दाखल झाल्या असून एसटी महामंडळाच्या आवारात ई-बस साठी आवश्यक असणारी चार्जिंग पॉईंटसुद्धा तयार करण्यात आली आहेत. या सर्व गाड्या वातानुकूलित असून ऑटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत. या गाड्यांमध्ये साधारण ३५ प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता आहे.


दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता या गाड्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. तसेच या बसेसमुळे आता इंधनाचा खर्चही कमी होणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली