Satara News : सातारकरांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल; प्रवास होणार आणखी आरामदायी!

सातारा : साताराकरांसाठी (Satara) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या ई-बस (Electric Bus) सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. त्यापासून कित्येक दिवस ई-बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांची आता प्रतिक्षा संपली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ई बसेस गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे साताराकरांचा आता वातानुकूलित (Air Conditioning) बसमधून आरामदायी प्रवास होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच एसटी महामंडळाच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई-बस सेवा सुरु केली आहे. साताऱ्यातील एसटी स्टँड मध्ये पहिल्या टप्प्यात पाच गाड्या दाखल झाल्या असून एसटी महामंडळाच्या आवारात ई-बस साठी आवश्यक असणारी चार्जिंग पॉईंटसुद्धा तयार करण्यात आली आहेत. या सर्व गाड्या वातानुकूलित असून ऑटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत. या गाड्यांमध्ये साधारण ३५ प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता आहे.


दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता या गाड्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. तसेच या बसेसमुळे आता इंधनाचा खर्चही कमी होणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा