‘प्रिय हा भारत देश’ : कविता आणि काव्यकोडी

माझा भारत देश,
मला आवडतो खूप
त्याच्या वैभवात दिसे, एकतेचे रूप

पश्चिमेचा किनारा, खुणावितो मला
हिमालयाच्या रांगा पाहून , जीव हा फुलला

मधोमध उभे जणू,
भव्य हे पठार
आनंदाने साद घाली,
रान हिरवेगार

खळाळून नद्या येती, आपल्या भेटीला
समृद्धीचे वरदान,
देती या भूमीला

धर्म, पंथ, जाती येथे, बोलीभाषा किती
मानवतेची भाषा सारे, हृदयातून बोलती

संतांचे विचार येथे,
आलेत रुजून
भूमी झालीय पावन, वीरांच्या त्यागातून

माझ्या या देशाचे,
सदा गाऊ गुणगान
ज्ञान-विज्ञान-श्रमाने, वाढवू त्याची शान

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) आझाद हिंद सेनेचे
नेतृत्व केले
‘फॉरवर्ड ब्लॉक’ संघटनेचे
कामही पाहिले

‘चलो दिल्ली’ घोषणेने
देश जागा केला
‘जय हिंद’चा नारा
कोणी घुमविला?

२) सार्वजनिक गणेशोत्सवाची
सुरुवात यांनी केली
केसरी व मराठा ही
वृत्तपत्रे काढली

स्वराज्याचा लढा दिला
जहाल होऊनी
‘गीतारहस्य’ग्रंथ
लिहिला बरं कोणी?

३) सर्वधर्मसमभावाची
शिकवण सदा देतो
विविधतेतून एकतेचे
दर्शन घडवितो

‘सत्यमेव जयते’ हे
ब्रीदवाक्य त्याचे
कमळ हे राष्ट्रीय फूल
सांगा कोणाचे?

उत्तर -


१) नेताजी सुभाषचंद्र बोस
२) लोकमान्य टिळक
३) भारत देश
Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले