जनतेच्या सहकार्याशिवाय कोणताही अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही - पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे

सफाळे : सफाळे पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक पत्रकार आदींसोबत मी नाळ बांधण्याचा प्रयत्न केला. कारण जोवर जनतेची साथ मिळत नाही तोवर कुठलाच पोलीस अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही असे, मत सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी व्यक्त केले. कासा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची बदली झाल्याने पोलीस स्टेशन कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी पो. नि. मांदळे बोलत होते.


आपल्या निरोप समारंभात ते पुढे म्हणाले की, पोलीस स्टेशनमधील एक वर्ष १४ दिवसांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था तसेच कोणताही राजकीय वादविवाद होऊ दिला नाही. “जीवनात प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीना काही शिकवून जातो असे सांगतानाच त्यांनी निवडणूक या तात्पुरत्या काळापुरता असतात त्यावेळेत कोणीही आपसातील हेवेदावे टाळून शांततेत निवडणूक पार पाडाव्यात अशा सूचना देखील केल्या.


यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील, काँग्रेसचे नेते सिकंदर शेख, पोलीस पाटील केतन पाटील, जेष्ठ नागरिक भिका सोनवणे, इंद्रमल जैन, पोलीस कर्मचारी कैलास शेळके आणि बांगर या सर्वांनी साश्रू नयनांनी पो.नि. मांदळे यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश किणी यांनी केले.

Comments
Add Comment

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी

विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे

शंभरापेक्षा अधिक जाहिरात फलकांवर कारवाई

विरार (प्रतिनिधी) : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या जाहिरातदारांवर मागील आठवडाभरात १० गुन्हे दाखल करण्यात

शहरात दिवाळीपूर्वी खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर करडी नजर

विरार (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी

विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

विरार : विरार पश्चिमेच्या ओलांडा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून