जनतेच्या सहकार्याशिवाय कोणताही अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही - पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे

सफाळे : सफाळे पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक पत्रकार आदींसोबत मी नाळ बांधण्याचा प्रयत्न केला. कारण जोवर जनतेची साथ मिळत नाही तोवर कुठलाच पोलीस अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही असे, मत सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी व्यक्त केले. कासा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची बदली झाल्याने पोलीस स्टेशन कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी पो. नि. मांदळे बोलत होते.


आपल्या निरोप समारंभात ते पुढे म्हणाले की, पोलीस स्टेशनमधील एक वर्ष १४ दिवसांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था तसेच कोणताही राजकीय वादविवाद होऊ दिला नाही. “जीवनात प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीना काही शिकवून जातो असे सांगतानाच त्यांनी निवडणूक या तात्पुरत्या काळापुरता असतात त्यावेळेत कोणीही आपसातील हेवेदावे टाळून शांततेत निवडणूक पार पाडाव्यात अशा सूचना देखील केल्या.


यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील, काँग्रेसचे नेते सिकंदर शेख, पोलीस पाटील केतन पाटील, जेष्ठ नागरिक भिका सोनवणे, इंद्रमल जैन, पोलीस कर्मचारी कैलास शेळके आणि बांगर या सर्वांनी साश्रू नयनांनी पो.नि. मांदळे यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश किणी यांनी केले.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांना तीन दिवस बंदी

घोडबंदर मार्गावरील दुरुस्तीसाठी बदल पालघर : ठाणे - घोडबंदर मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीचे नियोजन न

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा