Devendra Fadnavis : नालायकांनो आई, बहिणीचे प्रेम कोणीही खरेदी करु शकत नाही

  178

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले


पुणे : महायुतीचे सरकार ‘देना बँक’ सरकार आहे. लेना वाले नाही. मागच्या काळात वसुली करणारे सरकार होते. एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये पोहोचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. विरोधक म्हणतात की पंधराशे रुपयात महिलांना विकत घेत आहेत. नालायकांनो आई, बहिणीचे प्रेम कोणीही खरेदी करु शकत नाही. ही योजना माता-भगिणींच्याप्रती कृतज्ञता आहे. त्यांचे प्रेम, साथ यामुळे आम्हाला यश मिळते. परंतु, जे लोक सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आले. त्यांना पंधराशे रुपयांचे मोल समजू शकत नाही, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर केली.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ बालेवाडीत करण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की परकीयांचे आक्रमण ज्यावेळी आमच्यावार होत होते, त्यावेळी आई जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना निर्माण केली. मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यात सुरु झाली. केवळ राजकारण नाही तर समाजकारण, परिवर्तनाची पुणे ही भूमी आहे. त्यामुळे पुण्यातून या योजनेचा शुभारंभ केला. महायुतीचे सरकार ‘देना बँक’ सरकार आहे. लेना वाले नाही. मागच्या काळात वसुली करणारे सरकार होते. एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये पोहोचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे एकत्रित पैसे दिले जातील. ही खटाखट सारखी नव्हे फटाफट योजना आहे. थेट खात्यांमध्ये पैसे जातात. बहिणींना ओवाळणी द्यायची म्हटल्यावर सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. न्यायालयात गेले. न्यायालयाने नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक अर्जावर पुरुष, दुचाकी, बगीच्याचे छायाचित्र वापरले. अर्ज बाद होण्यासाठी कारस्थान केले. संकेतस्थळ बंद पडण्यासाठी डेटा (विदा) टाकला.


महिलांचा विकास झाला तरच भारत पुढे जाईल. महिला केंद्रीत योजना सुरु केल्या आहेत. लखपती, लेक लाडकी योजना सुरु केली. अर्थव्यस्थेच्या मुख्य धारेत महिलांना भागीदारी मिळाली पाहिजे. महिलांना अर्थव्यस्थेच्या केंद्रात आणल्यास राज्याची अर्थव्यस्था वेगात वाढेल. पूर्वी सरकारी योजना दलालांची होत होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटीची योजना सुरु केली आहे. आधार, बँक आणि मोबाईल या त्रिशुळमुळे थेट खात्यात पैसे पडले. दलालांचा धंदा बंद केल्याचेही फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर ही आहे तुमच्यासाठी गुडन्यूज

ठाणे महापालिकेत मेगाभरती, 'गट-क व गट-ड' पदांसाठी १ हजार ७७३ रिक्तपदे जाहीर

पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या डोळ्याला ‘काचबिंदू’

शहरातील ४ हजार ८०० पैकी तब्बल तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद पिंपरी : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे

‘दगडूशेठ हलवाई’च्या गणपतीचा प्रथमच बेल्जियममध्ये दणाणणार जयघोष

गणेशोत्सवात प्रतिकृतीची प्रतिष्ठापना; उत्सवासाठी मूर्ती सुपूर्द पुणे : ‘मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषासह

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

धुक्याने माखलेल्या जंगलात शेकरूंची उधळण जुन्नर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण, तर दोन्ही उपमुख्यमंत्री...

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर मुंबई: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ

खेड येथील अपघाताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

मुंबई: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्ताने दर्शनाला जाणाऱ्या महिला भाविकांच्या पिकअप